शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाचे लाखो रुपयांचे व्हॉल्व कुठे गेले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:45 IST

नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत लाखोंच्या घरात जाते. परंतु बदलविण्यात आलेले व्हॉल्व महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या गोडाऊ नमध्ये नाहीत. याची परपस्पर विल्हेवाट लावून लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देजलप्रदाय विभाग गप्प : परस्परच विकल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत लाखोंच्या घरात जाते. परंतु बदलविण्यात आलेले व्हॉल्व महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या गोडाऊ नमध्ये नाहीत. याची परपस्पर विल्हेवाट लावून लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारीआॅरेंज सिटी वॉटर कंपनीकडे देण्यापूर्वी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडे होती. २०१२ पासून ओसीडब्ल्यूकडे जबाबदारी देण्यात आली. गेल्या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत शहरातील जुन्या पाईप लाईन बदलवून नवीन टाकण्यात आल्या. तसेच गतकाळातही काही लाईन व व्हॉल्व बदलण्यात आले. परंतु भंगार व्हॉल्व व पाईप लाईनचा लिलाव झाला नाही. भंगार जलप्रदाय विभागाच्या गोडाऊ नमध्ये असायला हवे होते. मात्र या भंगार साहित्याचा ठावठिकाणा नसल्याचा मुद्दा काँग्रेसचे नितीन साठवणे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. मात्र यावर स्पष्टीकरण न देता प्रशासनाने गप्प बसण्याची भूमिका घेतली.गेल्या पाच-सहा वर्षात नागपूर शहरातील ७५० किलोमीटर लांबीची पाण्याची लाईन बदलण्यात आल्या. यासोबतच जुने व्हॉल्व काढून नवीन बसविण्यात आले. तर कुठे जलवाहिनी थेट जलकुंभाला जोडण्यात आली. सेमिनरी हिल्स येथील ब्रिटिशकालीन जलकुंभ व गोरेवाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात मोठे व्हॉल्व होते. नवीनीकरणात सर्व बदलण्यात आले. भंगार व्हॉल्व जलप्रदाय विभागाच्या गोरेवाडा येथील गोडाऊ नमध्ये सुरक्षित असणे अपेक्षित होते. मात्र या भंगार साहित्याचा ठावठिकाणा नाही. या भंगार विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत आला असता. यामुळे याचा शोध घेण्याची गरज आहे.कन्हान बंधाऱ्याचे गेट हरवलेकन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी महापालिकेने बंधारा उभारला होता. येथे लोखंडी गेट उभारण्यात आले होते. गेट गेल्या काही वर्षापूर्वी बेपत्ता झाले. तसेच येथील लोखंडी क्रेन बेपत्ता आहे. वास्तविक निरुपयोगी साहित्याच्या भंगार विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो. परंतु याची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे.भंगाराची चौकशी व्हावीमहापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. दुसरीकडे काही प्रमाणात का होईना भंगार व्हॉल्व व पाईपच्या विक्रीतून तिजोरीत महसूल जमा झाला असता. परंतु व्हॉल्वचा ठावठिकाणा नाही. सभागृहात मुद्दा उपस्थित करूनही प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिले नाही. हा प्रकार संशयास्पद असल्याची याची चौकशी करावी. अशी मागणी नितीन साठवणे यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार