शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कुठे गेले परीक्षांचे वेळापत्रक?

By admin | Updated: November 13, 2014 00:57 IST

सातत्याने बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हलगर्जीपणाचे आणखी एक उदाहरण सादर केले आहे. प्राध्यापकांवर वचक आणू न शकल्याने प्रश्नपत्रिकाच

नागपूर विद्यापीठ : अधिसूचनेत लिहून संकेतस्थळावर परीक्षांचे नवीन वेळापत्रक नाहीचनागपूर : सातत्याने बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हलगर्जीपणाचे आणखी एक उदाहरण सादर केले आहे. प्राध्यापकांवर वचक आणू न शकल्याने प्रश्नपत्रिकाच ‘सेट’ झाल्या नाही. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याची अखेर विद्यापीठाने घोषणा केली. परंतु अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे बुधवारी रात्रीपर्यंत नवीन वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणखी वाढीस लागला आहे.विधानसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा १० दिवस उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित परीक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी गंभीरतेने प्रयत्न होणे आवश्यक होते. परीक्षा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे प्राध्यापकांकडे लक्षच राहिले नाही अन् वेळेत प्रश्नपत्रिका ‘सेट’ झाल्याच नाहीत. नवीन परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर वेळापत्रक, इतर परीक्षा या बाबी मार्गी लावल्यानंतर हा मुद्दा त्यांच्या लक्षात आला. परंतु उशीर झाला असल्यामुळे नाईलाजाने ‘सीबीएस’ (क्रेडीट बेस सिस्टीम)पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या. ‘लोकमत’ने ही बाब प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठाने यासंदर्भात संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली. नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे असे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याही परीक्षेचे नवीन वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर दिसतच नसल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. विद्यापीठातील अधिकारी दिवसभर परीक्षा यंत्रणेच्या कामात व्यस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)जगाच्या मागे असणारे संकेतस्थळनागपूर विद्यापीठाचे संकेतस्थळ हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनदेखील प्रचंड प्रमाणात हलगर्जीपणा करत येत असल्याचा आरोप विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. परीक्षा विभागाने परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्याची अधिसूचना १० नोव्हेंबर रोजी काढली होती. परंतु संकेतस्थळावर मात्र १२ नोव्हेंबर रोजी ही अधिसूचना ‘अपलोड’ करण्यात आली. त्याअगोदर प्रसिद्धीमाध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पोहोचली होती. दरवेळीच विद्यापीठाचे संकेतस्थळ माहिती देण्यात मागे असते. एकीकडे ‘आयटी रिफॉर्म्स’चे मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाकडून याची दखल घेण्यात यावी व संकेतस्थळ सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.प्राध्यापक-प्रशासन ‘आमने-सामने’दरम्यान, परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्याप्रकरणी प्राध्यापक व विद्यापीठ प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवित आहे. आम्ही वेळेत विद्यापीठाला प्रश्नपत्रिका दिल्या होत्या. मग आमच्यावर आरोप का लावण्यात येत आहेत, असा प्रश्न अनेक प्राध्यापकांनी उपस्थित केला. परीक्षांची कामे वेळेवर होत आहेत की नाही हे पाहणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. प्राध्यापकांवर खापर फोडणे चुकीचे आहे, असे मत ‘नूटा’चे (नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन) सचिव डॉ.अनिल ढगे यांनी व्यक्त केले. संबंधित मुद्दा १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे.