घाटावर अडवणूक : मनपाच्या जाचक अटीनागपूर : शहरातील दहनघाटावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रासाठी महापालिकेने वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. वृद्धत्वामुळे वा अन्य कारणांनी नैसर्गिक मृत्यू झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे अवघड असल्याने मृताच्या नातेवाईकांपुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे. २०१२ मध्ये मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करताना लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. १ जून २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यापूर्वी मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र वा निवासी असल्याचा पुरावा दिला की मृताच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळत होते.अर्जातील २१ बाबींची पूर्तता केल्यानंतरच मृत्यू प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वसामान्यांची पिळवणूक नागपूर : नवीन निकषानुसार एखाद्याचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र, घरी नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास वस्तीतील डॉक्टरांचे मृत झाल्याचे प्रमाणपत्र, अपघाती मृत्यू झाला असल्यास पोलीस पंचनामा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर घरी मृत्यू झाला पण मृतावर सहा महिन्यापूर्वी एखाद्या रुग्णालयात उपचार झाले असल्यास संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक करण्यात आले आहे. परंतु सर्वसामान्यांना डॉक्टरांकडून प्रमाणपत्र प्राप्त करणे इतके सोपे नाही. अपघातात मृत्यू झाला असल्यास पोलीस पंचनामा अहवाल सादर करणे म्हणजे सर्वसामान्यांची यात पिळवणूक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आणायचे कुठून?
By admin | Updated: June 28, 2015 02:56 IST