शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वाघाच्या हाडांचे कनेक्शन नेमके कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST

नागपूर : खवासातील आदिवासींकडून जप्त केलेल्या वाघाच्या हाडांची संख्या आता पाच किलोवर गेली आहे. आपल्या घरामध्ये तब्बल पाच किलोपर्यंत ...

नागपूर : खवासातील आदिवासींकडून जप्त केलेल्या वाघाच्या हाडांची संख्या आता पाच किलोवर गेली आहे. आपल्या घरामध्ये तब्बल पाच किलोपर्यंत हाडे आणि अवयव दडवून ठेवणाऱ्या या आरोपींचे कनेक्शन नेमके कुठपर्यंत आहेत, हा आता तपासातील महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वीच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता, स्थानिक शिकारीचे संबंध थेट आंतरराष्ट्रीय तस्करांशी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या हाडाच्या खरेदीदारांच्या शोधाचे आता वनविभागापुढे आव्हान आहे.

खवासा प्रकरणात वनविभागाने आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात बालाराम वरखडे, नरेंद्र कोडवते, रोशन उईके (सीतापार आणि पेंडकेपार) तसेच कैलास भलावी, राहुल भलावी (बनेरा, ता. पारशिवनी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत वाघाची पाच किलो हाडे जप्त करण्यात आली आहेत. त्याची किंमत नेमकी आकारणी करणे शक्य नसले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती प्रचंड आहे. जप्त करण्यात आलेली हाडे नेमकी किती वाघांची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रयोगशाळेतील परीक्षण अहवालानंतरच हे स्पष्ट होणार आहे. या आरोपींवर मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल असल्याने त्यांना तपासासाठी त्यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

यासंदर्भात पेंचचे सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, वाघांच्या शिकारीनंतर त्यांच्या हाडांची विक्री करण्याचा प्रकार अंधश्रद्धेतून घडत असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीदार मांत्रिक तसेच स्थानिक खरेदीदार असू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तविला. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पुढे आल्यास आंतरराज्यीय टोळीशी संबंध आहे अथवा नाही हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

...

घटनांचे तीन राज्यात कनेक्शन

या घटनेतील वाघांच्या हत्येचे कनेक्शन छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या तीन राज्यात आहे. विशेषत: विदर्भ, बालाघाट आणि छत्तीसगडमध्ये या घटनेचे तार जुळले आहेत. जबलपूर, नागपूर, रायपूरदरम्यानच सध्याचे रॅकेट संबंधित असल्याचे सध्याच्या तपासात पुढे येत आहे.

...

म्हणून हाडांची घटना चिंताजनक!

वाघांच्या शिकारीएवढीच त्यांची तस्करी जास्त चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांना मागील काळात शिकारी टोळ्यांनी लक्ष्य केले आहे. त्यांचे अवयव आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी टोळ्यांच्या माध्यमातून विकले जात असल्याची बाब ट्रॅफिक आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ या दोन संस्थांनी यापूर्वीच उघड केली होती. कान्हा, कर्माझरी, पेंच, ताडोबा तसेच सुंदरबन आणि पश्चिम घाटातील जंगलक्षेत्रांना धोका व्यक्त केला होता. उत्तर प्रदेशातील रामनगर, मध्य प्रदेशातील बालाघाट आणि जबलपूर ही शहरे वन्यजीवांच्या अवयव वाहतुकीची केंद्रे असल्याचे वनविभागाकडे नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर हाडे जप्त होण्याची घटना महत्त्वाची ठरली आहे.

...