शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाली विद्यापीठाचे घोडे कुठे अडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:02 IST

पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे२० वर्षांपासूनची मागणी धूळखात दुजाभाव का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाली भाषेचे सांस्कृतिक महत्त्व व वारसा विचारात घेता तसेच महाराष्ट्रात पाली भाषेच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या पाहता पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी मागील २० वर्षांपासून साातत्याने लढा सुरू आहे. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरूआहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणाही केली. परंतु पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचे अध्ययन केले जाते. भारतीय संस्कृतीत भाषेचे दोन प्रवाह अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक पाली व दुसरी संस्कृत. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने संस्कृतच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्कृतची अनेक विद्यापीठे स्थापन केली आहेत. संस्था स्थापन केल्या आहेत. प्राकृतचे विद्यापीठसुद्धा स्थापन झाले आहे. परंतु पाली भाषेच्या विकासासाठी मात्र एकही स्वतंत्र विद्यापीठ नाही. त्यामुळे पालीचे विद्यापीठ व्हावे, यासाठी पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा व आंदोलने करण्यात आली. शासनदरबारी याची दखल घेण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात पाली विद्यापीठाची घोषणाही केली. परंतु पुढे त्याचे काय झाले काही कळायलाच मार्ग नाही.नागपुरातच व्हावे पाली विद्यापीठपाली विद्यापीठ ही काळाची गरज आहे. अनेक देशांमध्ये पालीचे अध्ययन केले जाते. ही प्राचीन भारतीय भाषा असून तिचे संवर्धन व विकासाची गरज आहे. शासनालाही ही बाब मान्य आहे. राज्याचा विचार केल्यास राज्यात पालीचा अभ्यास करणारे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. यात नागपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. तसेच अनेक विदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यामुळे पाली विद्यापीठासाठी नागपूर हे सर्वोत्तम आहे. यासाठी शासनदरबारी मागणी केली जात आहे. यासोबतच राज्यघटनेच्या शेड्यूल्ड आठमध्ये पाली भाषेचा समावेश करावा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, पाली अकादमी स्थापन करावी आदी मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.-डॉ. बालचंद्र खांडेकर, पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती 

 

टॅग्स :literatureसाहित्य