शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

पाली विद्यापीठाचे घोडे कुठे अडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:02 IST

पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे२० वर्षांपासूनची मागणी धूळखात दुजाभाव का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाली भाषेचे सांस्कृतिक महत्त्व व वारसा विचारात घेता तसेच महाराष्ट्रात पाली भाषेच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या पाहता पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी मागील २० वर्षांपासून साातत्याने लढा सुरू आहे. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरूआहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणाही केली. परंतु पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचे अध्ययन केले जाते. भारतीय संस्कृतीत भाषेचे दोन प्रवाह अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक पाली व दुसरी संस्कृत. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने संस्कृतच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्कृतची अनेक विद्यापीठे स्थापन केली आहेत. संस्था स्थापन केल्या आहेत. प्राकृतचे विद्यापीठसुद्धा स्थापन झाले आहे. परंतु पाली भाषेच्या विकासासाठी मात्र एकही स्वतंत्र विद्यापीठ नाही. त्यामुळे पालीचे विद्यापीठ व्हावे, यासाठी पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा व आंदोलने करण्यात आली. शासनदरबारी याची दखल घेण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात पाली विद्यापीठाची घोषणाही केली. परंतु पुढे त्याचे काय झाले काही कळायलाच मार्ग नाही.नागपुरातच व्हावे पाली विद्यापीठपाली विद्यापीठ ही काळाची गरज आहे. अनेक देशांमध्ये पालीचे अध्ययन केले जाते. ही प्राचीन भारतीय भाषा असून तिचे संवर्धन व विकासाची गरज आहे. शासनालाही ही बाब मान्य आहे. राज्याचा विचार केल्यास राज्यात पालीचा अभ्यास करणारे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. यात नागपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. तसेच अनेक विदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यामुळे पाली विद्यापीठासाठी नागपूर हे सर्वोत्तम आहे. यासाठी शासनदरबारी मागणी केली जात आहे. यासोबतच राज्यघटनेच्या शेड्यूल्ड आठमध्ये पाली भाषेचा समावेश करावा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, पाली अकादमी स्थापन करावी आदी मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.-डॉ. बालचंद्र खांडेकर, पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती 

 

टॅग्स :literatureसाहित्य