शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या ३२० पकडलेल्या पोत्यांची कारवाई कुठे थांबली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:25 IST

नागपूर : दिवाळीच्या एक दिवसापूर्वी कळमना पोलिसांनी बलवंत किराणा या रेशन दुकानावर धाड टाकून रेशनची ३२० पोती जप्त केली ...

नागपूर : दिवाळीच्या एक दिवसापूर्वी कळमना पोलिसांनी बलवंत किराणा या रेशन दुकानावर धाड टाकून रेशनची ३२० पोती जप्त केली होती. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने चौकशी समिती गठित केली होती. मात्र या प्रकरणात १ महिना लोटल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. नेमकी कारवाई थांबली कुठे, यासंदर्भात संभ्रम आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एफसीआयच्या गोदामातून रेशनचा पुरवठा वेगवेगळ्या दुकानात करण्यासाठी पुरवठादार वाहन घेऊन निघाले. या पुरवठादाराकडे ऑनलाईन ‘टीपी’ होती. या टीपीवर वेगवेगळ्या दुकानात पुरवठा करायचा असल्याची नोंद होती. मिळालेल्या माहितीनुसार रेशनच्या धान्याची ही पोती बलवंत किराणा दुकानात उतरविण्यात येत असताना, कळमना पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी धाड टाकली. त्यात ही पोती आढळून आली. परंतु रेशनचे हे धान्य असल्याने त्यासंदर्भात चौकशीसाठी अन्नधान्य वितरण विभागाला त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात आला. त्यासाठी विभागाने ५ सदस्यीय समिती गठित केली. परंतु या समितीने अजूनही या प्रकरणी अहवाल दिला नसल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे धान्य एका पुरवठादाराने खरेदी केले होते. ते बलवंत किराणा येथे उतरविण्यात येत होते. पोलिसांची धाड पडल्यानंतर बोगस टीपी बनविण्यात आली. यात पकडलेले धान्य बलवंत किराणा येथीलच असल्याचे दाखविण्यात आले होते.

पण पुढे या प्रकरणात कुठलाही खुलासा विभागाने केला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रेशन चोरीचे हे मोठे रॅकेट आहे. यात रेशन दुकानदारापासून पुरवठादार, एफसीआयचे अधिकारी, झोन अधिकारी, इन्स्पेक्टर, ट्रान्सपोर्टर या सर्वांचाच समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे.

- समितीकडून अहवाल आलेला नाही

यासंदर्भात अन्न व पुरवठा वितरण अधिकारी (शहर) सवई यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, पोलिसांनी आम्हाला पत्र दिले होते. त्यामुळे या प्रकरणात ५ सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीकडून अजूनही अहवाल आलेला नाही. समिती जो काही अहवाल देईल, तो पोलिसांच्या सुपूर्द करण्यात येईल. निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने अहवालाला वेळ लागतो आहे.