शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

‘त्या’ तंटामुक्त गाव समित्या आहेत तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

शरद मिरे भिवापूर : गावातील भांडणांचा गावातच निपटारा व्हावा यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट ...

शरद मिरे

भिवापूर : गावातील भांडणांचा गावातच निपटारा व्हावा यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ रोजी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियान राज्यभरात सुरू केले. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त गाव समित्यांची उभारणी झाली. गावातील तंटे गावातच निकाली निघू लागल्याने पोलिसांवरील ताण कमी होऊ लागला. मात्र, ‌‌हे महत्त्वाकांक्षी अभियान थांबले आहे. तंटामुक्त समित्या कुठे गायब तर कुठे निष्क्रिय झाल्यात. त्यांची नोंदसुद्धा प्रशासनाकडे नाही.

१५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झालेले तंटामुक्त अभियान २०१४-१५ पर्यंत उत्तमरित्या चालले. तंटामुक्त गावांना शासनाकडून पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक समितीची पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात नोंद असायची. समितीच्या बैठका सुध्दा नियमित व्हायच्या. मात्र, २०१५ पासून शासन आणि प्रशासनाचे तंटामुक्त अभियानाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तंटामुक्त अभियान आता केवळ नावापुरते मर्यादित आहे. त्यांच्या नोंदी, कार्याचा लेखाजोखा प्रशासनाकडे नाही. भिवापूर तालुक्यात १३७ गावे असून ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांशी गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. कुठे सक्रियरित्या काम सुरू आहे तर काही ठिकाणी केवळ नावच शिल्लक आहे. त्यांना शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नाही. सक्रिय समित्यांची नावेसुध्दा प्रशासनाकडे नाहीत.

तंटे पोहोचतात पोलीस ठाण्यात

प्रशासनाच्या दफ्तरी तंटामुक्त समित्यांचे महत्त्वच कमी झाल्यामुळे गावातही त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे लहान-मोठे तंटे आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचायला लागले आहेत. ‘आबां’च्या काळात तंटामुक्तीसाठी धडपडणारी गावे आता तंटायुक्त म्हणून ओळखली जावी. हे अभियानाचे नव्हे तर शासनाचे दुर्दैव आहे.

नक्षी येथील समिती सक्रिय

तालुक्यातील नक्षी येथे तंटामुक्त समितीचे कार्य चांगले आहे. येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वाद विवाद, तंटे असल्यास समितीला अर्ज करावा लागतो. त्यानंतर समिती दोन्ही पक्षकारांना बोलावून सामंजस्याने ही प्रकरणे सोडवितात. मात्र, त्यानंतरही समाधान न झाल्यास पोलीस स्टेशनचे दार ठोठावावे लागत असल्याचे सांगितले. मालेवाडा, चिचाळा येथे सुध्दा समिती सक्रिय आहे.

अध्यक्षांची निवड नियमित

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती होते. शासन व प्रशासनाकडे या समित्यांची सध्या नोंद नसली तरी, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बहुतांश ग्रामपंचायतीत आजही सुरू आहे. नियुक्ती झाल्यानंतर मात्र प्रशासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना मिळत नसल्यामुळे समिती केवळ गावापुरती आणि नावापुरती उभी असते.

---

तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून सहा महिन्यांपूर्वी माझी निवड झाली. तेव्हापासून गावात अंतर्गत भांडणे निकाली काढण्याचे काम यथोचित सुरू आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून आम्हांला कुठल्याही मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत. बैठका सुध्दा होत नाही.

- देविदास भजभूजे, अध्यक्ष तंटामुक्त समिती, मालेवाडा