शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

‘त्या’ तंटामुक्त गाव समित्या आहेत तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

शरद मिरे भिवापूर : गावातील भांडणांचा गावातच निपटारा व्हावा यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट ...

शरद मिरे

भिवापूर : गावातील भांडणांचा गावातच निपटारा व्हावा यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ रोजी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियान राज्यभरात सुरू केले. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त गाव समित्यांची उभारणी झाली. गावातील तंटे गावातच निकाली निघू लागल्याने पोलिसांवरील ताण कमी होऊ लागला. मात्र, ‌‌हे महत्त्वाकांक्षी अभियान थांबले आहे. तंटामुक्त समित्या कुठे गायब तर कुठे निष्क्रिय झाल्यात. त्यांची नोंदसुद्धा प्रशासनाकडे नाही.

१५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झालेले तंटामुक्त अभियान २०१४-१५ पर्यंत उत्तमरित्या चालले. तंटामुक्त गावांना शासनाकडून पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक समितीची पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात नोंद असायची. समितीच्या बैठका सुध्दा नियमित व्हायच्या. मात्र, २०१५ पासून शासन आणि प्रशासनाचे तंटामुक्त अभियानाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तंटामुक्त अभियान आता केवळ नावापुरते मर्यादित आहे. त्यांच्या नोंदी, कार्याचा लेखाजोखा प्रशासनाकडे नाही. भिवापूर तालुक्यात १३७ गावे असून ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांशी गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. कुठे सक्रियरित्या काम सुरू आहे तर काही ठिकाणी केवळ नावच शिल्लक आहे. त्यांना शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नाही. सक्रिय समित्यांची नावेसुध्दा प्रशासनाकडे नाहीत.

तंटे पोहोचतात पोलीस ठाण्यात

प्रशासनाच्या दफ्तरी तंटामुक्त समित्यांचे महत्त्वच कमी झाल्यामुळे गावातही त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे लहान-मोठे तंटे आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचायला लागले आहेत. ‘आबां’च्या काळात तंटामुक्तीसाठी धडपडणारी गावे आता तंटायुक्त म्हणून ओळखली जावी. हे अभियानाचे नव्हे तर शासनाचे दुर्दैव आहे.

नक्षी येथील समिती सक्रिय

तालुक्यातील नक्षी येथे तंटामुक्त समितीचे कार्य चांगले आहे. येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वाद विवाद, तंटे असल्यास समितीला अर्ज करावा लागतो. त्यानंतर समिती दोन्ही पक्षकारांना बोलावून सामंजस्याने ही प्रकरणे सोडवितात. मात्र, त्यानंतरही समाधान न झाल्यास पोलीस स्टेशनचे दार ठोठावावे लागत असल्याचे सांगितले. मालेवाडा, चिचाळा येथे सुध्दा समिती सक्रिय आहे.

अध्यक्षांची निवड नियमित

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती होते. शासन व प्रशासनाकडे या समित्यांची सध्या नोंद नसली तरी, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बहुतांश ग्रामपंचायतीत आजही सुरू आहे. नियुक्ती झाल्यानंतर मात्र प्रशासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना मिळत नसल्यामुळे समिती केवळ गावापुरती आणि नावापुरती उभी असते.

---

तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून सहा महिन्यांपूर्वी माझी निवड झाली. तेव्हापासून गावात अंतर्गत भांडणे निकाली काढण्याचे काम यथोचित सुरू आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून आम्हांला कुठल्याही मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत. बैठका सुध्दा होत नाही.

- देविदास भजभूजे, अध्यक्ष तंटामुक्त समिती, मालेवाडा