शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गाेदामातील धानाची उचल करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात सुरू केलेल्या पाचपैकी तीन शासकीय ...

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात सुरू केलेल्या पाचपैकी तीन शासकीय धान खरेदी केंद्रातील गाेदामे फुल्ल झाल्याने या केंद्रावरील धान खरेदी तात्पुरती बंद केली आहे. तालुक्यातील नाेंदणीकृत १,६०० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करावयाचे असल्याने धान खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाेदामांमधील धानाच्या पाेत्यांची उचल करून गाेदाम रिकामे करणेही आवश्यक आहे. परंतु, आदिवासी विकास महामंडळ महिनाभरापासून या गाेदामांमधील धानाची उचल करण्यास दिरंगाई करीत असल्याने, या विभागातील अनागाेंदी कारभार स्पष्ट हाेत असल्याचा आराेप धान उत्पादकांनी केला आहे.

बांद्रा येथील धान खरेदी केंद्र हे एकलव्य आदिवासी आश्रमशाळेत सुरू करण्यात आले असून, काही खाेल्यांमध्ये धानाची पाेती ठेवली आहेत. येथील काही खाेल्या अजूनही रिकाम्या असून, त्या धानाची पाेती ठेवण्यासाठी वापरता येऊ शकतात. या केंद्रावर ६५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती. यातील केवळ ६२ शेतकऱ्यांकडील धानाची माेजणी करण्यात आली असून, ५८८ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. या केंद्रावर महिनाभरात केवळ ६२ शेतकऱ्यांकडील धानाची माेजणी करण्यात आली. मग, ५८८ शेतकऱ्यांकडील धान माेजायला किती दिवस लागणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बेलदा (टुयापार) व पवनी येथील धान खरेदी केंद्रांची अशीच अवस्था आहे. शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्चला बंद हाेणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा असल्याने, आदिवासी विकास महामंडळ आगामी २५ दिवसात १,६०० शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करेल काय, असा प्रश्नही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शासकीय धान खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी याचा फायदा घेत कमी दरात धानाची खरेदी करायला सुरुवात केली आहे. काहींनी आर्थिक अडचण असल्याने व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात धान विकला आहे.

...

धानाचे नुकसान

रामटेक तालुक्यातील १,६०० नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे आदिवासी विकास महामंडळाने माेजमाप न केल्याने, त्यांनी घरीच धान साठवून ठेवला आहे. यातील अनेकांकडे धान साठवून ठेवण्यासाठी पुरेशी व सुरक्षित जागा नाही. काहींनी त्यांच्याकडील धान उघड्यावरच ठेवला आहे. त्यामुळे उंदरांनी पाेती कुरतडायला सुरुवात केली असून, धानाची नासाडी हाेत आहे. यात नुकसान शेतकऱ्यांनाच साेसावे लागणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्चला बंद हाेणार असल्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

...

केवळ २,२०० क्विंटल खरेदी

या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धानाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे (प्रति क्विंटल १,८८६ रुपये) खरेदी केली जात असून, ७०० रुपये प्रति क्विंटल (५० क्विंटलपर्यंत) अतिरक्त बाेनस दिला जात असल्याने, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २,५६८ रुपये भाव मिळताे. शासकीय खरेदी बंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हाच धान १,४०० रुपये ते १,५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,००० रुपये ते १,१०० रुपयांचे नुकसान साेसावे लागत आहे. विशेष म्हणले आदिवासी विकास महामंडळाने या तिन्ही केंद्रावर आजवर केवळ २,२०० क्विंटल धानाची खरेदी केली आहे.

...

मिलिंगला मुद्दाम विलंब

पूर्वी घाेटी येथील केंद्रावर खरेदी केलेला धान पटांगणात उघड्यावर ठेवला जायचा. तिथे धानाची पाेती बेवारस पडून असायची. यावर्षी मात्र आदिवासी विकास महामंडळाने गाेदाम फुल्ल असल्याचे सांगून खरेदी बंद केली आहे. वास्तवात, महामंडळाने धानाच्या खरेदीसाेबतच त्याच्या मिलिंगचीही तातडीने व्यवस्था करायला हवी हाेती. मिलिंगची व्यवस्था उशिरात करण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली असून, हा प्रकार मुद्दाम घडवून आणला जात असल्याचा आराेप जाणकार शेतकऱ्यांनी केला आहे.