शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळातील खावटी मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:13 IST

नागपूर : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या ...

नागपूर : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला होता. आदिवासी कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागाने खावटी देण्याचा निर्णय घेतला होता. हळुहळु सर्व क्षेत्र सरकारने अनलॉक केले. बंद पडलेल्या यंत्रणा सुरू झाल्या. पण अजूनही आदिवासी कुटुंबीयांना खावटी उपलब्ध झाली नाही.

१ मे रोजी आदिवासी विकास मंत्र्यांनी खावटी देण्याची घोषणा केली. ९ सप्टेंबर रोजी त्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला. खावटी अनुदान योजनेंतर्गत आदिवासी कुटुंबांना ४ हजार रुपये अनुदान वर्षभरासाठी देण्यात येणार होते. यात २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तूंच्या रुपात मिळणार होते. त्यासाठी ४८६ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली होती. सरकारने लॉकडाऊन उठविला. ९ महिने कोरोना संकटाचे झाले. पण खावटी योजनेची अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही निविदा प्रक्रिया आणि कागदोपत्री नोकरशाहीत अडकली आहे. खावटीचा लाभ देण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन कुटुंबांचा सर्वे केला. त्या सर्वेचाही काही पत्ता नाही.

खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांना जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार अभावी मदतीची खूप गरज होती. तेव्हा अन्नधान्याची गरज जास्त होती. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे हातउसने व कर्ज घेऊन त्यांनी आपली गरज भागविली. आता रोजगाराच्या शोधात अनेक आदिवासी कुटुंब स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे अन्नधान्य स्वरूपात आता केलेली मदत त्यांच्याकडे पोहचणे शक्य नाही.

- रोख स्वरुपात मदत करावी

खावटी योजनेंतर्गत शासन ज्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणार आहे, त्याची प्रक्रिया अत्यंत दिरंगाईची आहे. वस्तू खरेदीसाठी ई-निविदा भरण्याची अंतिम तारीख १ जानेवारी २०२० होती परंतु ती आता २४ जानेवारी २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जानेवारी २०२१ पर्यंत होण्याची शक्यता नाही. तसेच खरेदीत व वाटपात अनेक गैरप्रकार होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. आता आदिवासी बांधवांना आता वस्तूची उपयुक्तता राहिली नाही. त्यांची खरी गरज आता देणे चुकविणे आहे. त्यामुळे वस्तूरुपात मदत न करता सरसकट ४००० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात यावे, अशी मागणी अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली आहे.