शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

प्रकल्पग्रस्तांना न्याय केव्हा मिळणार?

By admin | Updated: December 3, 2015 03:40 IST

सातव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरदारांचे पगार लाखावर जातील, तर दुसरीकडे मिहानचे प्रकल्पग्रस्त शेतकरी पाच हजाराच्या नोकरीसाठी धडपडत आहेत.

शिवणगावातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : ४ रोजी सरकारची प्रेतयात्रा काढणारनागपूर : सातव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरदारांचे पगार लाखावर जातील, तर दुसरीकडे मिहानचे प्रकल्पग्रस्त शेतकरी पाच हजाराच्या नोकरीसाठी धडपडत आहेत. शेतकऱ्यांचे पुनर्वसन करताना त्यांना चारपट फायदा मिळावा, या धोरणाकडे सरकारने कानाडोळा केला आहे. सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ४ डिसेंबरला सरकारची प्रेतयात्रा काढणार असल्याचा इशारा शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिला.मागण्या १० वर्षांपासून प्रलंबितहिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. गजराज प्रकल्प आणि शिवणगावातील शेतकऱ्यांना शेतीचा वाढीव मोबदला, शहरात १२.५ टक्के विकसित जमीन, घरांचे पुनर्वसन व मोबदला, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी आदींसह अनेक मागण्या तब्बल १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि सरकारदरबारी अनेक चकरा मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या आहेत. आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रेतावर मिहानचा विकास होत असेल तर तो आम्हाला मान्य नाही. न्याय केव्हा मिळणार, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केला.पुनर्वसन याद्यांमध्ये घोळसरकारने पुनर्वसनासाठी तीन याद्या प्रकाशित केल्या. सरकार शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी समजत नाही. सात बारावर नाव असेल तर तोच शेतकरी, अशी त्यांची भूमिका आहे. सरकारने २००६ मध्ये पुनर्वसन केले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता. सरकार वेळोवेळी निकष बदलत आहे. येथील बहुतांश घरे जीर्ण झाली आहेत. बरीच पडली आहेत. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या विकासाच्या तीन वर्षांपासून निविदा काढण्यात येत आहे. शिवणगाव, गावठाण, नवे गावठाण, विक्तुबाबानगर येथील शेतकऱ्यांच्या ११६० घरांचा मोबदला हवा आहे. सरकारचा कागदोपत्री होणारा विकास शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटत आहे. न्यायालयाने येथील शेतकऱ्यांसाठी एकरी ५ लाख रुपये वाढीव मोबदला ठरविला आहे. याउलट जयताळ येथील लोकांना एकरी ६० लाख रुपये देण्यात येणार आहे. असा भेदभाव करून सरकार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. एमएडीसी प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देते, पण नोकरी देत नाही. मिहान-सेझमध्ये शेतीचे मालक गार्ड आणि चौकीदार झाले आहेत. आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, असे एमएडीसीचे अधिकारी उत्तरे देतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक नाहीपूर्वीचे आमदार आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासोबत काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. पण त्यांना आमच्या मागण्यांचा विसर पडला आहे. ते उद्योजकांसोबत नियमित बैठका घेतात, पण वर्षभरात प्रकल्पग्रस्तांसोबत एकही बैठक घेतली नाही. मिहान प्रकल्प बोगस असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. गजराज प्रकल्पग्रस्तांचे १९९३ पासून पुनर्वसन झालेले नाही. त्यांना आणि शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांना एकाच भावाने शेतीचा मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.