शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रकल्पग्रस्तांना न्याय केव्हा मिळणार?

By admin | Updated: December 3, 2015 03:40 IST

सातव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरदारांचे पगार लाखावर जातील, तर दुसरीकडे मिहानचे प्रकल्पग्रस्त शेतकरी पाच हजाराच्या नोकरीसाठी धडपडत आहेत.

शिवणगावातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : ४ रोजी सरकारची प्रेतयात्रा काढणारनागपूर : सातव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरदारांचे पगार लाखावर जातील, तर दुसरीकडे मिहानचे प्रकल्पग्रस्त शेतकरी पाच हजाराच्या नोकरीसाठी धडपडत आहेत. शेतकऱ्यांचे पुनर्वसन करताना त्यांना चारपट फायदा मिळावा, या धोरणाकडे सरकारने कानाडोळा केला आहे. सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ४ डिसेंबरला सरकारची प्रेतयात्रा काढणार असल्याचा इशारा शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिला.मागण्या १० वर्षांपासून प्रलंबितहिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. गजराज प्रकल्प आणि शिवणगावातील शेतकऱ्यांना शेतीचा वाढीव मोबदला, शहरात १२.५ टक्के विकसित जमीन, घरांचे पुनर्वसन व मोबदला, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी आदींसह अनेक मागण्या तब्बल १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि सरकारदरबारी अनेक चकरा मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या आहेत. आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रेतावर मिहानचा विकास होत असेल तर तो आम्हाला मान्य नाही. न्याय केव्हा मिळणार, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केला.पुनर्वसन याद्यांमध्ये घोळसरकारने पुनर्वसनासाठी तीन याद्या प्रकाशित केल्या. सरकार शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी समजत नाही. सात बारावर नाव असेल तर तोच शेतकरी, अशी त्यांची भूमिका आहे. सरकारने २००६ मध्ये पुनर्वसन केले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता. सरकार वेळोवेळी निकष बदलत आहे. येथील बहुतांश घरे जीर्ण झाली आहेत. बरीच पडली आहेत. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या विकासाच्या तीन वर्षांपासून निविदा काढण्यात येत आहे. शिवणगाव, गावठाण, नवे गावठाण, विक्तुबाबानगर येथील शेतकऱ्यांच्या ११६० घरांचा मोबदला हवा आहे. सरकारचा कागदोपत्री होणारा विकास शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटत आहे. न्यायालयाने येथील शेतकऱ्यांसाठी एकरी ५ लाख रुपये वाढीव मोबदला ठरविला आहे. याउलट जयताळ येथील लोकांना एकरी ६० लाख रुपये देण्यात येणार आहे. असा भेदभाव करून सरकार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. एमएडीसी प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देते, पण नोकरी देत नाही. मिहान-सेझमध्ये शेतीचे मालक गार्ड आणि चौकीदार झाले आहेत. आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, असे एमएडीसीचे अधिकारी उत्तरे देतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक नाहीपूर्वीचे आमदार आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासोबत काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. पण त्यांना आमच्या मागण्यांचा विसर पडला आहे. ते उद्योजकांसोबत नियमित बैठका घेतात, पण वर्षभरात प्रकल्पग्रस्तांसोबत एकही बैठक घेतली नाही. मिहान प्रकल्प बोगस असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. गजराज प्रकल्पग्रस्तांचे १९९३ पासून पुनर्वसन झालेले नाही. त्यांना आणि शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांना एकाच भावाने शेतीचा मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.