शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस कधी होणार सुरू ? ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाने बंद केल्या. त्या ऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर रेल्वेगाड्याही बंद ...

नागपूर : कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाने बंद केल्या. त्या ऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर रेल्वेगाड्याही बंद असल्यामुळे तसेच नागपुरातून सुटणाऱ्या महत्वाच्या रेल्वेगाड्या अद्याप सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

सध्या सुरु असलेल्या महत्वाच्या रेल्वेगाड्या

अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

ब) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस

क) ०२२८० हावडा-पुणे एक्स्प्रेस

ड) ०२७२२ निजामुद्दीन-हैदराबाद एक्स्प्रेस

ई) ०८२३६ हजरत निजामुद्दीन-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस

फ) ०८२४४ भगत की कोठी-बिलासपूर एक्स्प्रेस

या गाड्या कधी सुरू होणार ?

अ) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

ब) ०२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस

क) ०२२२४ अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस

ड) ०२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस

ई) ०२१५९ नागपूर-जबलपूर एक्स्प्रेस

पॅसेंजर गाड्यांचा अद्याप निर्णय नाही

प्रवाशांच्या दृष्टीने पॅसेंजर रेल्वेगाड्या महत्वाच्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांना कमी तिकीट देऊन प्रवास करणे शक्य होते. परंतु मागील दीड वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कोरोनामुळे पॅसेंजर गाड्या बंद केलेल्या आहेत. त्या ऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. परंतु सध्या पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार नाही. रेल्वे बोर्डाने सूचना केल्यानंतर पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील, असे अधिकारी सांगत आहेत.

पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात

‘पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांना अधिक रक्कम मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु करण्याची गरज आहे.’

-वसंत काळे, प्रवासी

पुण्यासाठी रेल्वेगाड्या सुरू कराव्यात

‘नागपूर तसेच विदर्भातून अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्याला ये-जा करतात. परंतु पुण्यासाठी असलेल्या नागपूर-पुणे एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आणि अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे.’

-ब्रिजेश्वर ठाकूर, प्रवासी

............