शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नागपूर पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?

By admin | Updated: August 11, 2015 03:31 IST

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नागपूरसुद्धा

नागपूर : देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नागपूरसुद्धा पॉलिबॅग मुक्त व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगची निर्मिती, विक्री आणि उपयोगावर प्रतिबंध लावण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणीही झाली. त्यानंतरही छोटे दुकानदार, हातठेल्यावर सामान विकणारे विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगमध्ये ग्राहकांना वस्तू देत असल्याचे बाजारात चित्र आहे. यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या विभागाचे अधिकारी दुकानदारांवर कारवाई तर करतात, पण दुसऱ्याच मिनिटाला विक्रेते या नियमाची ऐसीतैसी करतात.राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅग निर्मितीवर प्रतिबंध असतानाही बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅग कुठून येतात, हा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा पॉलिबॅग तयार करणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण आणू शकत नाही, असेही म्हणणे चुकीचे ठरेल. जनजागृती हाच त्यावर उपाय आहे. नागनाल्याचा प्रवाह प्रभावित४५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅगचे पुनर्चक्रण होऊ शकत नाही. या बॅग नदी, तलाव, नाल्यांमध्ये फेकल्यामुळे पाणी प्रदूषित होते. नाल्याचा प्रवाह प्रभावित होतो. नागनाला (पूर्वमध्ये नदी) हे त्याचे ताजे उदाहरण आहे. अशा स्थितीत नागरिकांनी कमी जाडीच्या बॅगचा उपयोग करू नये. त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कापडी थैल्यांचा अधिकाधिक उपयोग करावा. या विषयावर जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. पॉलिथिन खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू४प्रदूषण नियंत्रणावर काम करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या मुद्यावर संस्थेचे अभियान सुरू आहे. कमी जाडीचे पॉलिबॅग खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये विशेषत: गायी मृत्युमुखी पडतात. पॉलिथिनमुळे नाल्या तुंबल्यानंतर मुंबईत पूर आला होता. नागपुरातील मॉल्स आणि मोठी दुकाने वगळता सुमारे ६० टक्के छोटे दुकानदार आणि हातठेल्यांवर आतासुद्धा ५० मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या प्लॅस्टिक बॅगचा धडाक्यात उपयोग सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. नियमानुसार उत्पादन ४विदर्भ प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नियम लागू झाल्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बॅग तयार करणे बंद केले. आधी जे या व्यवसायात होते, त्यांनीसुद्धा आपला व्यवसाय बंद केला आहे. आता ते प्लॅस्टिकची उत्पादने तयार करतात. शहरात विकल्या जाणाऱ्या पॉलिबॅग लगतच्या राज्यातून येतात. त्याचे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. मनपाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह ४मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅगची विक्री करणाऱ्यांवर निरंतर कारवाई करण्यात येते. पण सध्या कारवाई मंदावल्याचे त्यांनी मान्य केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी रेकॉर्ड पाहून आकडेवारी देऊ, असे सांगितले. लेह लडाखपासून धडा घ्यावा४लेह लडाख दीड दशकाआधीच पॉलिथीन बॅगमुक्त झाला आहे. तेथील लोक नमूद केलेल्या जागेवरच बॅग फेकतात. त्या बॅगचा साठा लेह लडाखच्या बाहेर नेला जातो. त्यांच्यापासून धडा घेण्याची गरज आहे. प्रदूषणमुक्त होण्यात सहभागी व्हा४पॉलिथीन बॅगचा तुम्ही उपयोग करीत असल्यास प्रदूषण वाढविण्यात तुमचाही तेवढाच सहभाग आहे. नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा जाड पॉलिबॅगचा उपयोग करा. खरेदीसाठी कापडाची थैली सोबत न्यावी. प्रदूषणमुक्त शहर बनविण्यात तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता.