शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

मराठी नाट्य लेखक व्यापक होतील कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:24 IST

९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होणार, असा परखड सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देनाट्यलेखन कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकूणच भारतीय नाटके जगाच्या तुलनेत फारच मागे आहेत. त्यातल्यात्यात मराठी नाट्य लेखक अजूनही कुटुंब आणि व्यक्तीमध्येच अडकले आहेत. गांधी, जीना, आंबेडकर, सावरकरांसारख्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी समाजात, अजूनही त्यांच्या विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची धमक नसल्याची भावना व्यक्त करीत ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होणार, असा परखड सवाल उपस्थित केला.नाट्य परिषदेच्या वतीने नंदनवन येथील महिला महाविद्यालयात आयोजित द्विदिवसीय नाट्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे सदस्य शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना भागडीकर, नाट्य लेखक महेंद्र सुके, पराग घोंगे, डॉ. निलकांत कुलसंगे, नरेंद्र शिंदे उपस्थित होते.लेखकांच्या डोक्यातील आग कधीच कमी होत नाही. मात्र, लेखकांमध्ये रसिकांच्या डोक्याला त्रास देण्याचे कसब असायला हवे. वेदना, जाणीव, नकार, विद्रोह आणि करुणेतून ही क्षमता निर्माण होते. करुणेचा अभाव असेल तर नाटक कधीच पूर्ण होत नसल्याचे गज्वी यावेळी म्हणाले. आपलं नाटक कुटुंबात अडकलं आहे. व्यक्ती, समाज इथपर्यंत एखाद दुसरे लेखक पोहोचले आहेत.मात्र, आता राष्ट्र विरुद्ध राष्ट्र अशी नाट्य लेखकांची व्याप्ती होणे गरजेचे असल्याचे प्रेमानंद गज्वी म्हणाले. संचालन नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे उपाध्यक्ष उपक्रम नरेश गडेकर यांनी केले तर आभार प्रकाश एदलाबादकर यांनी मानले.मोदींनी ट्रम्पच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही !काश्मीर प्रश्नावर ट्रम्पने मोदींनी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. खरे काय ते दोघांनाच ठाऊक़ मात्र, सांगितलंही असेल. कारण, ते राजकारण आहे आणि कुठे काय बोलावे आणि काय नाही, हे ट्रम्प आणि मोदी या दोघांनाही माहीत आहे. मोदींनी दोघांमध्ये काय बातचीत केली, हे सांगण्याची किंवा ट्रम्पच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. राजकारणात पूर्णसत्य कधीच सांगू नये, असे स्वत: डॉ. आंबेडकरांनी सांगितले असल्याचे प्रेमानंद गज्वी यावेळी म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्य