शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

महिलांची कुचंबणा कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:18 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे

ठळक मुद्देअडीच वर्षात १२ महिला शौचालये: सभागृहातील गोंधळामुळे चर्चा टळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु वर्दळीच्या वा बाजार भागात शौचालयाची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. याचा विचार करता भाजपाचे नगरसेवक निशांत गांधी यांनी सोमवारी सभागृहात शौचालय सुविधाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु बसपाच्या नगरसेवकांनी धुमाकूळ घातल्याने या महत्त्वाच्या विषयावरील चर्चा बारगळल्याने महिलांची होणारी कुचंबणा कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.२०१५ मध्ये शहरातील वर्दळीच्या व मोक्याच्या ५० ठिकाणी महिला शौचालये उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन उपायुक्त संजय काकडे यांनी ६ एप्रिल २०१५ रोजी न्यायालयात याबाबत शपथपत्र दिले होते. यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्य शौचालये उभारण्यास तयार आहे. शौचालयाची देखभाल, पाणी , वीज व जागा महापालिकेने उपलब्ध करावयाची आहे. परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या अडीच वर्षात जेमतेम १२ अस्थायी शौचालये उभारण्यात आलेली आहेत. उर्वरित शौचालये कधी उभारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. निशांत गांधी यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली असती, तर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असता.शौचालयाची सुविधा नसल्याने वेळप्रसंगी लघवी वा शौच रोखून धरावी लागते. याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. संसर्गजन्य व मूत्राशयाचे आजार होण्याचा धोका असतो. वास्तविक न्यायालयाच्या निर्देशानुसार बाजार वा वर्दळीच्या भागात प्रत्येकी ५०० मीटर अंतरावर महिला शौचालयांची सुविधा असायला हवी. शौचालयाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, दर फलक, सेवा मोफत की शुल्क आकारले जाते, याची माहिती असलेले फलक, दिव्यांगांसाठी रॅम्प अशा सुविधांची गरज आहे. शहरात उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या ठिकाणी या सुविधा नाही. शौचालयातील सुविधा व समस्या मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. परंतु या समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही.हॉटेलमधील शौचालय वापरण्याला संमतीनागपूर शहराच्या विविध भागात तसेच वर्दळीच्या बाजार भागात हॉटेल्स आहेत. सार्वजनिक शौचालयांची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. हे विचारात घेता हॉटेल्समधील शौचालयांचा महिलांना वापर करता यावा, यासाठी अनुमती मिळण्यासंदर्भात नगसेवक निशांत गांधी यांनी नागपूर रेसिडेंटल हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी याला सहमती दर्शविली आहे. महिला व युवतींना वेळप्रसंगी गरज भासल्यास हॉटेलमधील शौचालयाचा वापर करता येईल, अशी माहिती निशांत गांधी यांनी दिली. यामुळे शहरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.