शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सरकार हमीभाव कधी जाहीर करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

कोंढाळी : मान्सून राज्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला ...

कोंढाळी : मान्सून राज्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामाकरिता हमीभावाची घोषणा न केल्याने कोणत्या पिकांची पेरणी करावी याचे नियोजन करण्यास शेतकरी संभ्रमात सापडला आहे. त्यामुळे खरीप हंगामाकरिता पिकांचे हमीभाव सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

काटोल तालुक्यात शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीकरिता तयारी करीत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा लॉकडाऊन, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टर भाडे, मजुरी तसेच सोयाबीनचे बियाणे आदी सर्वच खर्चात गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असल्याने केंद्र शासनाने खरीप हंगामाच्या पिकाकरिता हमीभावाची घोषणा करताना वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. बहुतांश शेतकऱ्यांकरिता ‘हमीभाव’ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारने हमीभावांची घोषणा करताना हमीभावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांचा माल कुणीही खरेदी करणार नाही, असा आदेशही घ्यावा, अशीही मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे हमीभाव जाहीर होताना गत दीड वर्षात शेतकऱ्यावर ओढावलेल्या संकटाचाही विचार होणे आवश्यक आहे. यासोबतच व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षताही घेण्यात यावी, अशी मागणी खापरी (बारोकर) येथील शेतकरी सतीश चव्हाण यांनी केली आहे.