शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकार हमीभाव कधी जाहीर करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

कोंढाळी : मान्सून राज्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला ...

कोंढाळी : मान्सून राज्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामाकरिता हमीभावाची घोषणा न केल्याने कोणत्या पिकांची पेरणी करावी याचे नियोजन करण्यास शेतकरी संभ्रमात सापडला आहे. त्यामुळे खरीप हंगामाकरिता पिकांचे हमीभाव सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

काटोल तालुक्यात शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीकरिता तयारी करीत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा लॉकडाऊन, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टर भाडे, मजुरी तसेच सोयाबीनचे बियाणे आदी सर्वच खर्चात गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असल्याने केंद्र शासनाने खरीप हंगामाच्या पिकाकरिता हमीभावाची घोषणा करताना वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. बहुतांश शेतकऱ्यांकरिता ‘हमीभाव’ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारने हमीभावांची घोषणा करताना हमीभावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांचा माल कुणीही खरेदी करणार नाही, असा आदेशही घ्यावा, अशीही मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे हमीभाव जाहीर होताना गत दीड वर्षात शेतकऱ्यावर ओढावलेल्या संकटाचाही विचार होणे आवश्यक आहे. यासोबतच व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षताही घेण्यात यावी, अशी मागणी खापरी (बारोकर) येथील शेतकरी सतीश चव्हाण यांनी केली आहे.