शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आणि पीककर्ज खात्यात जमा करून तेवढे कर्जाची तेवढी रक्कम कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. नांद परिसरातील ३६५ लाभार्थ्यांपैकी केवळ १६ लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांनी ती अद्यापही मिळाली नाही. दुसरीकडे, परतीचा पाऊस व किडींमुळे साेयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती जेमतेम आहे तर या बियाण्यांचे दर कमालीचे वाढले असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा विपरित परिस्थितीत खरीप नियाेजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

शेतकऱ्यांनी घरातील बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्याची उगवणशक्ती तपासून बघावी, असे कृषी विभागाच्यावतीने वारंवार आवाहन केले जात आहे. वास्तवात, मागील हंगामात किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडील साेयाबीन खराब झाले. कापणीच्यावेळी पीक पावसात भिजल्याने काळवंडलेल्या व बुरशी लागलेल्या त्या साेयाबीनच्या दाण्यांची उगवणशक्ती किती असेल, याची जाणीव मात्र कुणालाही नाही. राज्यभर साेयाबीन बियाण्यांच्या तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना प्रति बॅग (३० किलाे) ३,४०० ते ३,५०० रुपये माेजावे लागणार आहे. बाजारात साेयाबीनचे (बियाणे नाही) दर प्रति क्विंटल ७,५०० रुपयांवर पाेहाेचले आहे.

पेरणीसाठी पैसा हवा म्हणून शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड करीत नव्याने पीककर्ज घेणे सुरू केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून चालू पीककर्जावर ७ टक्के व्याजदर आकाराला जात आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा हाेईल व थाेडा दिलासा मिळेल, या आशेवरही पाणी फेरले आहे. कारण, नांद परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ३६५ व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १६ कर्जदार खातेदारांना याचा लाभ मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांना हा लाभ मिळाला असून, उर्वरित ३६५ लाभार्थी आजही प्रतीक्षेत आहे.

...

अवकाळी पाऊस घातक

शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, वखरणी केली असून, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी जमीन चांगली तापणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार अवकाळी पावसाच्या सरी बरसत असल्याने जमीन पुरेसी तापत नसल्याने जमिनीतील घातक बुरशी व जिवाणू नष्ट हाेत नाही. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पिके या बुरशी व जिवाणूंमुळे मूळकुज व तत्सम राेगांना बळी पडणार असल्याची व त्यातून पिकांचे माेठे नुकसान हाेणार असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस सध्या शेतीसाठी घातक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

...

उत्पादन खर्च वाढणार

नांद व परिसरात बुधवारी (दि. १९) सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तास बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला व नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. लाॅकडाऊनमुळे मजूर घरीच आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामेही हातावेगळी केली आहेत. पीककर्जाची रक्कम अद्याप हाती न आल्याने बियाणे व रासायनिक खतांची जुळवाजुळव करायची कशी, ही चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच बियाणे व खतांच्या किमती वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

===Photopath===

190521\5606videoshot_20210519_122955.jpg

===Caption===

पाऊसाने झोडपले