शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आणि पीककर्ज खात्यात जमा करून तेवढे कर्जाची तेवढी रक्कम कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. नांद परिसरातील ३६५ लाभार्थ्यांपैकी केवळ १६ लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांनी ती अद्यापही मिळाली नाही. दुसरीकडे, परतीचा पाऊस व किडींमुळे साेयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती जेमतेम आहे तर या बियाण्यांचे दर कमालीचे वाढले असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा विपरित परिस्थितीत खरीप नियाेजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

शेतकऱ्यांनी घरातील बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्याची उगवणशक्ती तपासून बघावी, असे कृषी विभागाच्यावतीने वारंवार आवाहन केले जात आहे. वास्तवात, मागील हंगामात किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडील साेयाबीन खराब झाले. कापणीच्यावेळी पीक पावसात भिजल्याने काळवंडलेल्या व बुरशी लागलेल्या त्या साेयाबीनच्या दाण्यांची उगवणशक्ती किती असेल, याची जाणीव मात्र कुणालाही नाही. राज्यभर साेयाबीन बियाण्यांच्या तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना प्रति बॅग (३० किलाे) ३,४०० ते ३,५०० रुपये माेजावे लागणार आहे. बाजारात साेयाबीनचे (बियाणे नाही) दर प्रति क्विंटल ७,५०० रुपयांवर पाेहाेचले आहे.

पेरणीसाठी पैसा हवा म्हणून शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड करीत नव्याने पीककर्ज घेणे सुरू केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून चालू पीककर्जावर ७ टक्के व्याजदर आकाराला जात आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा हाेईल व थाेडा दिलासा मिळेल, या आशेवरही पाणी फेरले आहे. कारण, नांद परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ३६५ व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १६ कर्जदार खातेदारांना याचा लाभ मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांना हा लाभ मिळाला असून, उर्वरित ३६५ लाभार्थी आजही प्रतीक्षेत आहे.

...

अवकाळी पाऊस घातक

शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, वखरणी केली असून, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी जमीन चांगली तापणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार अवकाळी पावसाच्या सरी बरसत असल्याने जमीन पुरेसी तापत नसल्याने जमिनीतील घातक बुरशी व जिवाणू नष्ट हाेत नाही. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पिके या बुरशी व जिवाणूंमुळे मूळकुज व तत्सम राेगांना बळी पडणार असल्याची व त्यातून पिकांचे माेठे नुकसान हाेणार असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस सध्या शेतीसाठी घातक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

...

उत्पादन खर्च वाढणार

नांद व परिसरात बुधवारी (दि. १९) सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तास बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला व नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. लाॅकडाऊनमुळे मजूर घरीच आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामेही हातावेगळी केली आहेत. पीककर्जाची रक्कम अद्याप हाती न आल्याने बियाणे व रासायनिक खतांची जुळवाजुळव करायची कशी, ही चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच बियाणे व खतांच्या किमती वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

===Photopath===

190521\5606videoshot_20210519_122955.jpg

===Caption===

पाऊसाने झोडपले