शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आणि पीककर्ज खात्यात जमा करून तेवढे कर्जाची तेवढी रक्कम कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. नांद परिसरातील ३६५ लाभार्थ्यांपैकी केवळ १६ लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांनी ती अद्यापही मिळाली नाही. दुसरीकडे, परतीचा पाऊस व किडींमुळे साेयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती जेमतेम आहे तर या बियाण्यांचे दर कमालीचे वाढले असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा विपरित परिस्थितीत खरीप नियाेजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

शेतकऱ्यांनी घरातील बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्याची उगवणशक्ती तपासून बघावी, असे कृषी विभागाच्यावतीने वारंवार आवाहन केले जात आहे. वास्तवात, मागील हंगामात किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडील साेयाबीन खराब झाले. कापणीच्यावेळी पीक पावसात भिजल्याने काळवंडलेल्या व बुरशी लागलेल्या त्या साेयाबीनच्या दाण्यांची उगवणशक्ती किती असेल, याची जाणीव मात्र कुणालाही नाही. राज्यभर साेयाबीन बियाण्यांच्या तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना प्रति बॅग (३० किलाे) ३,४०० ते ३,५०० रुपये माेजावे लागणार आहे. बाजारात साेयाबीनचे (बियाणे नाही) दर प्रति क्विंटल ७,५०० रुपयांवर पाेहाेचले आहे.

पेरणीसाठी पैसा हवा म्हणून शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड करीत नव्याने पीककर्ज घेणे सुरू केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून चालू पीककर्जावर ७ टक्के व्याजदर आकाराला जात आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा हाेईल व थाेडा दिलासा मिळेल, या आशेवरही पाणी फेरले आहे. कारण, नांद परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ३६५ व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १६ कर्जदार खातेदारांना याचा लाभ मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांना हा लाभ मिळाला असून, उर्वरित ३६५ लाभार्थी आजही प्रतीक्षेत आहे.

...

अवकाळी पाऊस घातक

शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, वखरणी केली असून, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी जमीन चांगली तापणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार अवकाळी पावसाच्या सरी बरसत असल्याने जमीन पुरेसी तापत नसल्याने जमिनीतील घातक बुरशी व जिवाणू नष्ट हाेत नाही. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पिके या बुरशी व जिवाणूंमुळे मूळकुज व तत्सम राेगांना बळी पडणार असल्याची व त्यातून पिकांचे माेठे नुकसान हाेणार असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस सध्या शेतीसाठी घातक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

...

उत्पादन खर्च वाढणार

नांद व परिसरात बुधवारी (दि. १९) सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तास बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला व नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. लाॅकडाऊनमुळे मजूर घरीच आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामेही हातावेगळी केली आहेत. पीककर्जाची रक्कम अद्याप हाती न आल्याने बियाणे व रासायनिक खतांची जुळवाजुळव करायची कशी, ही चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच बियाणे व खतांच्या किमती वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

===Photopath===

190521\5606videoshot_20210519_122955.jpg

===Caption===

पाऊसाने झोडपले