शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मोखाबर्डीचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

शरद मिरे भिवापूर: महत्वाकांक्षी मोखाबर्डी योजना पूर्णाकृत होत आहे. योजनेचे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

शरद मिरे

भिवापूर: महत्वाकांक्षी मोखाबर्डी योजना पूर्णाकृत होत आहे. योजनेचे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण सिंचन क्षमतेपैकी अंदाजे ८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास योजना सज्ज आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचण्याचे अद्याप नाव नाही. गत वर्षभरापासून शेतकरी सिंचनासाठी योजनेचे पाणी मागत आहे. त्यामुळे मोखाबर्डीचे पाणी आसुसलेल्या पिकांची आणि नैराशात जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांची तहान भागविणार कधी असा प्रश्न विचारला जात आहे

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर आधारित मरू नदीच्या उजव्या काठावर मोखाबर्डी उपासा सिंचन योजना उभारण्यात आली आहे. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन झाले. सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २ हजार ५७९ कोटी रूपयांची ही योजना भिवापूर तालुक्यातील ५० गावे तर पवनी (जि.भंडारा) तालुक्यातील ११ व चिमुर (जि.चंद्रपूर) तालुक्यातील १०५ गावे असे एकून १६६ गावातील एकूण २८ हजार २३५ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणणारी आहे. मात्र भूमिपूजनानंतर अपुरा निधी, कंत्राटदाराची हेकेखोरी, अधिकाऱ्यांची आळशी प्रवृत्ती, शासनाचे दुर्लक्षित धोरण यामुळे ही योजना २०१५ पर्यंत रखडली होती. मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे २०१५ पासून योजनेच्या कामाने गती घेतली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या स्थितीत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचे काम ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. २८ हजार २३५ हेक्टर सिंचन क्षमतेपैकी अंदाजे ८ हजार हेक्टर सिंचन क्षमता तयार आहे. एक दोनवेळा ट्रायल बेस प्रात्यक्षिकांव्दारे योजनेतून पाणी सुध्दा सोडण्यात आले. असे असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी योजनेचे पाणी का दिल्या जात नाही हा प्रश्नच आहे.

वरिष्ठांकडून योजनेची चाचपणी

धडाक्यात सुरू असलेल्या मोखाबर्डी योजनेच्या कामाची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी ९ जुलै २०१८ रोजी योजनेला भेट दिली. यावेळी एकूण सिंचन क्षमतेपैकी ४,५७८ हेक्टर सिंचन क्षमता तयार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८ रोजी केंद्रीय जलसंधारण विभागाचे आयुक्त के. व्होरा यांनी सुद्धा भेट दिली. त्यावेळी योजना सिंचनासाठी सज्ज असून केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले होते.

७,०६५ हेक्टर सिंचन सुविधेचे लोकार्पण

सिंचन सुविधेसाठी सज्ज असलेल्या मोखाबर्डी योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळावे. यासाठी तत्कालीन आ. सुधीर पारवे यांनी प्रयत्न चालविले. याचीच दखल घेत शासनाने १६ सप्टेंबर २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ७,०६५ हेक्टर सिंचन सुविधेचे लोकार्पण केले. तेव्हा केवळ ट्रायल बेसवर शेतकऱ्यांना पाणी मिळाले. त्यानंतर खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना योजनेच्या नव्हे तर निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहावे लागत आहे.

.......

महत्वाकांक्षी मोखाबर्डी उपसा सिंचन योजना.