शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

झाेपडपट्टीवासीयांचा वनवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या सराय झाेपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या सराय झाेपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. त्यांना शासनाच्या काेणत्याही कल्याणकारी याेजनांचा लाभही घेता येत नाही. त्यांच्या वाट्याला आलेला हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

ही झाेपडपट्टी ५० वर्षांपूर्वी वसली आहे. येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजीविका करतो. प्रशासनाने आपल्याला केवळ मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा केली. परंतु त्यांच्या या मागणीकडे कुणीही कधीच गांभीर्याने घेतले नाही. याच काळात त्यांची दुसरी पिढी अभावात जीवन व्यतित करीत आहे. विशेष म्हणजे, येथील बहुतांश नागरिकांची नावे मतदार यादीत असल्याने ते मतदानाचा नियमित हक्क बजावतात. मात्र, त्यांना शासनाच्या काेणत्याही याेजनेचा कधीच लाभ मिळाला नाही.

या भागात पिण्याच्या पाण्याची काेणतीही साेय अद्याप करण्यात आली नाही. पाण्याची पाईपलाईन टाकून सार्वजिक नळ देण्याचे औदार्यदेखील प्रशासनाने दाखविले नाही. त्यामुळे येथील नागरिक मिळेल तेथील पाणी पिऊन तहान शमवितात. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यादेखील नाही. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी डबके साचल्याचे व त्यात डासांची पैदास हाेत असल्याचे वाढत असून, त्यांच्या आराेग्यालाही धाेका उद्भवत आहे. या भागात सार्वजनिक शाैचालये नाही. आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांना घरी शाैचालयाचे बांधकाम करणे शक्य नाही. त्यामुळे तरुणी व महिलांची कुचंबणा हाेते. येथील नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या असल्या तरी त्यांना शासनाच्या घरकूल, उज्ज्वला गॅस यासह अन्य महत्त्वाच्या व वैयक्तिक लाभाच्या याेजनांचा लाभ घेता येत नाही.

---

नियमितीकरणाचे प्रयत्न

कामठी शहरात रामगड, सैलाबनगर, वारिसपुरा, आझादनगर, कामगारनगर या भागात झाेपडपट्ट्या असून, तिथे तळागाळातील नागरिक कुटुंबासह राहातात. यात सराय झाेपडपट्टी ही सर्वात जुनी आहे. मध्यंतरी सन १९९५ पूर्वी वसलेल्या झाेपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले हाेते. परंतु यात सातत्य नसल्याने यश आले नाही. परिणामी, येथील नागरिकांना काेणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाही.