शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास स्मारकाचा वनवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:10 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले आहे. या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्ती व सुधारणांसाठी शासनाच्या वतीने निधी दिला जात असला तरी त्याचा याेग्य विनियाेग व फायदा हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे या स्मारकाचा वनवास संपविण्यासाठी त्याचे पालकत्व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाकडे द्यावे, तसेच पालिका प्रशासनाने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण याेजना निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याचा पालिकेच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत पालिकेची सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. निधीची टंचाई, आजवर करण्यात आलेली कामे, त्यांचा दर्जा व त्यानंतर झालेली स्मारकाची ‘जैसे थे’ अवस्था बघता स्मारकाचा हा वनवास कधी संपणार हे सांगणेही कठीण आहे. विद्यापीठ या स्मारकाचे पालकत्व स्वीकारायला व त्याची काळजी घ्यायला सर्वताेपरी तयार आहे; पण विद्यापीठाला यात पालिकेचा काेणताही हस्तक्षेप नकाे आहे.

नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी साधे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कारंजे दुरुस्त करून विजेचे साधे व आकर्षक दिवे लावणे, त्यावरील विजेच्या बिलाचा खर्च करणे, परिसराचे साैंदर्यीकरण करणे, केलेली कामे अधिकाधिक काळ टिकून राहणे यासह अन्य बाबी पालिका प्रशासनाला आजवर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात ही कामे पालिकेला जमेल आणि त्या कामांचा दर्जा उत्तम असेल, याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

शहरात स्मारक हस्तांतरणाच्या अटींवरून राजकीय नेत्यांमध्ये मतभेद दिसून येतात. मात्र, सामान्य जनतेच्या मते पालिकेने त्यांच्या अटी मागे घेऊन कालिदास स्मारक विनाअट विद्यापीठाकडे हस्तांतरित करावे. याबाबत बहुतांश नागरिक पालिकेने आजवर केलेल्या कामाचा व स्मारकाच्या ‘जैसे थे’ अवस्थेचा दाखला देतात.

...

पालिकेच्या अटी विद्यापीठाला अमान्य

स्मारक हस्तांतरणात रामटेक नगरपालिका प्रशासनाने येथील संगीत कारंजे सुरू करावेत, परिसराचे साैंदर्यीकरण पूर्ण झाल्यावर जनतेसाठी जर प्रवेश तिकीट लावत असेल तर त्यात पालिकेला सहभागी करावे, स्मारक प्रवेशद्वारावर पालिकेच्या नावाचा उल्लेख असावा, या तीन अटी घातल्या आहेत. या अटी साध्या वाटत असल्या तरी पालिकेला नावाच्या रूपाने काही न करता त्यांचे वर्चस्व व अस्तित्व स्मारकात कायम ठेवायचे आहे. विद्यापीठाला या अटी मान्य नसल्याने त्यांनी हस्तांतरण प्रस्ताव परत पाठविला आहे.

...

विराेध, समर्थनाचेही राजकारण

निधीअभावी साैंदर्यीकरणासह अन्य कामे रखडली आहेत. यासाठी पालिकेने ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घाेषणा केली आहे. हा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने त्यांच्या अटी मागे घ्याव्यात, असे मत माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर भाेयर यांनी व्यक्त केले असून, याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. पालिकेने घातलेल्या अटी साध्या व जनतेच्या हिताच्या आहेत. विद्यापीठाने त्या मान्य करायला हव्यात. पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजना वित्त आयाेग निधीतून देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविता येताे, असे मत भाजपचे संजय मुलमुले यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, पालिकेला हा निधी यापूर्वीही मिळायचा. मात्र, स्मारकाच्या अवस्थेत फारसा बदल झाला नाही.

...

नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजनेंतर्गत चार काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ५० लाख रुपये कालिदास स्मारकाच्या दुरुस्ती व साैंदर्यीकरणावर खर्च करण्याचा निर्णय पालिकेने सर्वानुमते घेतला आहे.

- दिलीप देशमुख, नगराध्यक्ष,

नगरपालिका, रामटेक