शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

कालिदास स्मारकाचा वनवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:10 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले आहे. या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्ती व सुधारणांसाठी शासनाच्या वतीने निधी दिला जात असला तरी त्याचा याेग्य विनियाेग व फायदा हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे या स्मारकाचा वनवास संपविण्यासाठी त्याचे पालकत्व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाकडे द्यावे, तसेच पालिका प्रशासनाने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण याेजना निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याचा पालिकेच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत पालिकेची सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. निधीची टंचाई, आजवर करण्यात आलेली कामे, त्यांचा दर्जा व त्यानंतर झालेली स्मारकाची ‘जैसे थे’ अवस्था बघता स्मारकाचा हा वनवास कधी संपणार हे सांगणेही कठीण आहे. विद्यापीठ या स्मारकाचे पालकत्व स्वीकारायला व त्याची काळजी घ्यायला सर्वताेपरी तयार आहे; पण विद्यापीठाला यात पालिकेचा काेणताही हस्तक्षेप नकाे आहे.

नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी साधे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कारंजे दुरुस्त करून विजेचे साधे व आकर्षक दिवे लावणे, त्यावरील विजेच्या बिलाचा खर्च करणे, परिसराचे साैंदर्यीकरण करणे, केलेली कामे अधिकाधिक काळ टिकून राहणे यासह अन्य बाबी पालिका प्रशासनाला आजवर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात ही कामे पालिकेला जमेल आणि त्या कामांचा दर्जा उत्तम असेल, याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

शहरात स्मारक हस्तांतरणाच्या अटींवरून राजकीय नेत्यांमध्ये मतभेद दिसून येतात. मात्र, सामान्य जनतेच्या मते पालिकेने त्यांच्या अटी मागे घेऊन कालिदास स्मारक विनाअट विद्यापीठाकडे हस्तांतरित करावे. याबाबत बहुतांश नागरिक पालिकेने आजवर केलेल्या कामाचा व स्मारकाच्या ‘जैसे थे’ अवस्थेचा दाखला देतात.

...

पालिकेच्या अटी विद्यापीठाला अमान्य

स्मारक हस्तांतरणात रामटेक नगरपालिका प्रशासनाने येथील संगीत कारंजे सुरू करावेत, परिसराचे साैंदर्यीकरण पूर्ण झाल्यावर जनतेसाठी जर प्रवेश तिकीट लावत असेल तर त्यात पालिकेला सहभागी करावे, स्मारक प्रवेशद्वारावर पालिकेच्या नावाचा उल्लेख असावा, या तीन अटी घातल्या आहेत. या अटी साध्या वाटत असल्या तरी पालिकेला नावाच्या रूपाने काही न करता त्यांचे वर्चस्व व अस्तित्व स्मारकात कायम ठेवायचे आहे. विद्यापीठाला या अटी मान्य नसल्याने त्यांनी हस्तांतरण प्रस्ताव परत पाठविला आहे.

...

विराेध, समर्थनाचेही राजकारण

निधीअभावी साैंदर्यीकरणासह अन्य कामे रखडली आहेत. यासाठी पालिकेने ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घाेषणा केली आहे. हा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने त्यांच्या अटी मागे घ्याव्यात, असे मत माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर भाेयर यांनी व्यक्त केले असून, याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. पालिकेने घातलेल्या अटी साध्या व जनतेच्या हिताच्या आहेत. विद्यापीठाने त्या मान्य करायला हव्यात. पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजना वित्त आयाेग निधीतून देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविता येताे, असे मत भाजपचे संजय मुलमुले यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, पालिकेला हा निधी यापूर्वीही मिळायचा. मात्र, स्मारकाच्या अवस्थेत फारसा बदल झाला नाही.

...

नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजनेंतर्गत चार काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ५० लाख रुपये कालिदास स्मारकाच्या दुरुस्ती व साैंदर्यीकरणावर खर्च करण्याचा निर्णय पालिकेने सर्वानुमते घेतला आहे.

- दिलीप देशमुख, नगराध्यक्ष,

नगरपालिका, रामटेक