शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कालिदास स्मारकाचा वनवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:10 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले आहे. या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्ती व सुधारणांसाठी शासनाच्या वतीने निधी दिला जात असला तरी त्याचा याेग्य विनियाेग व फायदा हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे या स्मारकाचा वनवास संपविण्यासाठी त्याचे पालकत्व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाकडे द्यावे, तसेच पालिका प्रशासनाने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण याेजना निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याचा पालिकेच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत पालिकेची सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. निधीची टंचाई, आजवर करण्यात आलेली कामे, त्यांचा दर्जा व त्यानंतर झालेली स्मारकाची ‘जैसे थे’ अवस्था बघता स्मारकाचा हा वनवास कधी संपणार हे सांगणेही कठीण आहे. विद्यापीठ या स्मारकाचे पालकत्व स्वीकारायला व त्याची काळजी घ्यायला सर्वताेपरी तयार आहे; पण विद्यापीठाला यात पालिकेचा काेणताही हस्तक्षेप नकाे आहे.

नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी साधे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कारंजे दुरुस्त करून विजेचे साधे व आकर्षक दिवे लावणे, त्यावरील विजेच्या बिलाचा खर्च करणे, परिसराचे साैंदर्यीकरण करणे, केलेली कामे अधिकाधिक काळ टिकून राहणे यासह अन्य बाबी पालिका प्रशासनाला आजवर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात ही कामे पालिकेला जमेल आणि त्या कामांचा दर्जा उत्तम असेल, याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

शहरात स्मारक हस्तांतरणाच्या अटींवरून राजकीय नेत्यांमध्ये मतभेद दिसून येतात. मात्र, सामान्य जनतेच्या मते पालिकेने त्यांच्या अटी मागे घेऊन कालिदास स्मारक विनाअट विद्यापीठाकडे हस्तांतरित करावे. याबाबत बहुतांश नागरिक पालिकेने आजवर केलेल्या कामाचा व स्मारकाच्या ‘जैसे थे’ अवस्थेचा दाखला देतात.

...

पालिकेच्या अटी विद्यापीठाला अमान्य

स्मारक हस्तांतरणात रामटेक नगरपालिका प्रशासनाने येथील संगीत कारंजे सुरू करावेत, परिसराचे साैंदर्यीकरण पूर्ण झाल्यावर जनतेसाठी जर प्रवेश तिकीट लावत असेल तर त्यात पालिकेला सहभागी करावे, स्मारक प्रवेशद्वारावर पालिकेच्या नावाचा उल्लेख असावा, या तीन अटी घातल्या आहेत. या अटी साध्या वाटत असल्या तरी पालिकेला नावाच्या रूपाने काही न करता त्यांचे वर्चस्व व अस्तित्व स्मारकात कायम ठेवायचे आहे. विद्यापीठाला या अटी मान्य नसल्याने त्यांनी हस्तांतरण प्रस्ताव परत पाठविला आहे.

...

विराेध, समर्थनाचेही राजकारण

निधीअभावी साैंदर्यीकरणासह अन्य कामे रखडली आहेत. यासाठी पालिकेने ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घाेषणा केली आहे. हा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने त्यांच्या अटी मागे घ्याव्यात, असे मत माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर भाेयर यांनी व्यक्त केले असून, याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. पालिकेने घातलेल्या अटी साध्या व जनतेच्या हिताच्या आहेत. विद्यापीठाने त्या मान्य करायला हव्यात. पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजना वित्त आयाेग निधीतून देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविता येताे, असे मत भाजपचे संजय मुलमुले यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, पालिकेला हा निधी यापूर्वीही मिळायचा. मात्र, स्मारकाच्या अवस्थेत फारसा बदल झाला नाही.

...

नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजनेंतर्गत चार काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ५० लाख रुपये कालिदास स्मारकाच्या दुरुस्ती व साैंदर्यीकरणावर खर्च करण्याचा निर्णय पालिकेने सर्वानुमते घेतला आहे.

- दिलीप देशमुख, नगराध्यक्ष,

नगरपालिका, रामटेक