शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

पूर नियंत्रणासाठी नाला सफाई करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे गरजेचे आहे. यावर्षी राेहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यातच यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही नाले साफ केले नाहीत. प्रशासनाची ही अनास्था पुराचा धाेका वाढविणारी असल्याने ही कामे नेमकी करणार कधी, असा प्रश्न नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काेराेना संक्रमणामुळे प्रशासकीय यंत्रणा काेराेना नियंत्रण कार्यात गुंतली आहे. मात्र, संभाव्य धाेका टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणेही तितकेच गरजेचे आहे. रामटेक तालुक्यात दरवर्षी सरासरी ११०० मिमी पावसाची नाेंद हाेते. त्यातच गवळण नाल्याला येणारा पूर दरवर्षी डाेकेदुखी ठरताे. या नाल्याच्या पुरामुळे काठावरील शीतलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुरुकुलनगर, आनंदनगर, दमयंतीनगर व इतर नागरी वस्त्या जलमय हाेतात. त्यामुळे हा धाेका टाळण्यासाठी या नाल्याची व्यवस्थित साफसफाई करणे गरजेचे आहे.

या नाल्याकाठच्या मुरमुरा भट्टीजवळील वळणावर नाल्यात माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडसर निर्माण हाेत असल्याने पुराचा धाेका वाढताे. त्यासाठी ही झुडपे ताेडून पात्र साफ करणे आवश्यक आहे. या नाल्याचे खाेलीकरण व रप्ट्याची समस्या सर्व लाेकप्रतिनिधींना माहिती आहे. ही समस्या साेडवण्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची ग्रामपंचायत प्रशासनाची ऐपत नसल्याने स्थानिक नेत्यांच्या स्थानिक विकास निधीतून पैसा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

...

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

गवळण नाल्याला पूर आल्यानंतर त्या काठच्या नागरी वस्त्यांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घर, विहिरी व रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात या नाल्याचा चिखल व कचरा साचताे. या नाल्यावरील पूल कमी उंचीचा असल्याने नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागताे. वारंवार मागणी करूनही उंच पूल बांधण्यात आला नाही. या नाल्याला बांधलेली सुरक्षा भिंतही निरुपयाेगी ठरली आहे. रहदारीचा रप्टाही पाण्याखाली येत असल्याने नवी समस्या निर्माण हाेते.