शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पूर नियंत्रणासाठी नाला सफाई करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे गरजेचे आहे. यावर्षी राेहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यातच यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही नाले साफ केले नाहीत. प्रशासनाची ही अनास्था पुराचा धाेका वाढविणारी असल्याने ही कामे नेमकी करणार कधी, असा प्रश्न नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काेराेना संक्रमणामुळे प्रशासकीय यंत्रणा काेराेना नियंत्रण कार्यात गुंतली आहे. मात्र, संभाव्य धाेका टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणेही तितकेच गरजेचे आहे. रामटेक तालुक्यात दरवर्षी सरासरी ११०० मिमी पावसाची नाेंद हाेते. त्यातच गवळण नाल्याला येणारा पूर दरवर्षी डाेकेदुखी ठरताे. या नाल्याच्या पुरामुळे काठावरील शीतलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुरुकुलनगर, आनंदनगर, दमयंतीनगर व इतर नागरी वस्त्या जलमय हाेतात. त्यामुळे हा धाेका टाळण्यासाठी या नाल्याची व्यवस्थित साफसफाई करणे गरजेचे आहे.

या नाल्याकाठच्या मुरमुरा भट्टीजवळील वळणावर नाल्यात माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडसर निर्माण हाेत असल्याने पुराचा धाेका वाढताे. त्यासाठी ही झुडपे ताेडून पात्र साफ करणे आवश्यक आहे. या नाल्याचे खाेलीकरण व रप्ट्याची समस्या सर्व लाेकप्रतिनिधींना माहिती आहे. ही समस्या साेडवण्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची ग्रामपंचायत प्रशासनाची ऐपत नसल्याने स्थानिक नेत्यांच्या स्थानिक विकास निधीतून पैसा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

...

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

गवळण नाल्याला पूर आल्यानंतर त्या काठच्या नागरी वस्त्यांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घर, विहिरी व रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात या नाल्याचा चिखल व कचरा साचताे. या नाल्यावरील पूल कमी उंचीचा असल्याने नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागताे. वारंवार मागणी करूनही उंच पूल बांधण्यात आला नाही. या नाल्याला बांधलेली सुरक्षा भिंतही निरुपयाेगी ठरली आहे. रहदारीचा रप्टाही पाण्याखाली येत असल्याने नवी समस्या निर्माण हाेते.