शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पूर नियंत्रणासाठी नाला सफाई करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे गरजेचे आहे. यावर्षी राेहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यातच यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही नाले साफ केले नाहीत. प्रशासनाची ही अनास्था पुराचा धाेका वाढविणारी असल्याने ही कामे नेमकी करणार कधी, असा प्रश्न नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काेराेना संक्रमणामुळे प्रशासकीय यंत्रणा काेराेना नियंत्रण कार्यात गुंतली आहे. मात्र, संभाव्य धाेका टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणेही तितकेच गरजेचे आहे. रामटेक तालुक्यात दरवर्षी सरासरी ११०० मिमी पावसाची नाेंद हाेते. त्यातच गवळण नाल्याला येणारा पूर दरवर्षी डाेकेदुखी ठरताे. या नाल्याच्या पुरामुळे काठावरील शीतलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुरुकुलनगर, आनंदनगर, दमयंतीनगर व इतर नागरी वस्त्या जलमय हाेतात. त्यामुळे हा धाेका टाळण्यासाठी या नाल्याची व्यवस्थित साफसफाई करणे गरजेचे आहे.

या नाल्याकाठच्या मुरमुरा भट्टीजवळील वळणावर नाल्यात माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडसर निर्माण हाेत असल्याने पुराचा धाेका वाढताे. त्यासाठी ही झुडपे ताेडून पात्र साफ करणे आवश्यक आहे. या नाल्याचे खाेलीकरण व रप्ट्याची समस्या सर्व लाेकप्रतिनिधींना माहिती आहे. ही समस्या साेडवण्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची ग्रामपंचायत प्रशासनाची ऐपत नसल्याने स्थानिक नेत्यांच्या स्थानिक विकास निधीतून पैसा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

...

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

गवळण नाल्याला पूर आल्यानंतर त्या काठच्या नागरी वस्त्यांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घर, विहिरी व रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात या नाल्याचा चिखल व कचरा साचताे. या नाल्यावरील पूल कमी उंचीचा असल्याने नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागताे. वारंवार मागणी करूनही उंच पूल बांधण्यात आला नाही. या नाल्याला बांधलेली सुरक्षा भिंतही निरुपयाेगी ठरली आहे. रहदारीचा रप्टाही पाण्याखाली येत असल्याने नवी समस्या निर्माण हाेते.