शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

कालव्यालगतचे अतिक्रमण हटविणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पेंच प्रकल्पाच्या मायनरलगत रामटेक तालुक्यातील काचूरवाही व मसला येथे अतिक्रमण करण्यात आल्याने मायनर बुजल्यागत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पेंच प्रकल्पाच्या मायनरलगत रामटेक तालुक्यातील काचूरवाही व मसला येथे अतिक्रमण करण्यात आल्याने मायनर बुजल्यागत झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी या कालव्यासह मायनरची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नाेटिसा बजावल्या. या नाेटिसा पाठवून १५ दिवस झाले आहेत. मात्र, अतिक्रमण हटवण्यात आले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा मुख्य मायनर काचूरवाही व मसला गावालगत गेला आहे. या मायनरलगत दाेन्ही गावांमधील काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याने मायनर बुजल्यागत झाला. त्यातून पूर्ण दाबाने पाणी पुढे जात नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. शिवाय, पाण्याचा अपव्यव वाढला असून, मायनर फुटण्याची शक्यताही बळावली आहे. ही समस्या साेडविण्यासाठी ‘लाेकमत’मध्ये १६ जानेवारी राेजी ‘पेंच कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात’ तसेच ११ फेब्रुवारी राेजी ‘रामटेक पाटबंधारे विभागाचे कारवाईचे आदेश’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते.

या वृत्ताची दखल घेेत पाटबंधारे विभागाच्या रामटेक कार्यालयातील अभियंता थाेटे यांनी या अतिक्रमणाची लगेच पाहणी केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने अतिक्रमणधारकांना २७ जानेवारी राेजी अतिक्रमण काढण्यासंदर्भात नाेटिसा बजावल्या. अतिक्रमण काढण्यासाठी या नाेटिसीमध्ये नमूद असलेला कालावधी संपला आहे. या काळात अतिक्रमणधारकांनी किंवा पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढले नाही. परिणामी, हा मायनर बुजल्यागत झाला असून, त्याचा शेतकऱ्यांना त्रास हाेत आहे. कालवा व मायनरच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण पूर्णपणे काढावे, तसेच त्याची साफसफाई करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

...

गुन्हे दाखल करण्याची सूचना

मायनरलगतचे अतिक्रमण सात दिवसात काढून मायनर माेकळा करण्यात यावा. अतिक्रमण न काढल्यास, अवैध बांधकाम करून शासकीय जमीन व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९६७ अन्वये अतिक्रमणधारकांवर फाैजदारी गुन्हा नाेंदविण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख त्या नाेटिसीमध्ये करण्यात आला आहे. वास्तवात, याला १५ दिवस पूर्ण झाले असून, पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढले नाही. शिवाय, कुणावरही फाैजदारी गुन्हे दाखल केले नाहीत.