शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

कालव्यालगतचे अतिक्रमण हटविणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पेंच प्रकल्पाच्या मायनरलगत रामटेक तालुक्यातील काचूरवाही व मसला येथे अतिक्रमण करण्यात आल्याने मायनर बुजल्यागत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पेंच प्रकल्पाच्या मायनरलगत रामटेक तालुक्यातील काचूरवाही व मसला येथे अतिक्रमण करण्यात आल्याने मायनर बुजल्यागत झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी या कालव्यासह मायनरची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नाेटिसा बजावल्या. या नाेटिसा पाठवून १५ दिवस झाले आहेत. मात्र, अतिक्रमण हटवण्यात आले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा मुख्य मायनर काचूरवाही व मसला गावालगत गेला आहे. या मायनरलगत दाेन्ही गावांमधील काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याने मायनर बुजल्यागत झाला. त्यातून पूर्ण दाबाने पाणी पुढे जात नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. शिवाय, पाण्याचा अपव्यव वाढला असून, मायनर फुटण्याची शक्यताही बळावली आहे. ही समस्या साेडविण्यासाठी ‘लाेकमत’मध्ये १६ जानेवारी राेजी ‘पेंच कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात’ तसेच ११ फेब्रुवारी राेजी ‘रामटेक पाटबंधारे विभागाचे कारवाईचे आदेश’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते.

या वृत्ताची दखल घेेत पाटबंधारे विभागाच्या रामटेक कार्यालयातील अभियंता थाेटे यांनी या अतिक्रमणाची लगेच पाहणी केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने अतिक्रमणधारकांना २७ जानेवारी राेजी अतिक्रमण काढण्यासंदर्भात नाेटिसा बजावल्या. अतिक्रमण काढण्यासाठी या नाेटिसीमध्ये नमूद असलेला कालावधी संपला आहे. या काळात अतिक्रमणधारकांनी किंवा पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढले नाही. परिणामी, हा मायनर बुजल्यागत झाला असून, त्याचा शेतकऱ्यांना त्रास हाेत आहे. कालवा व मायनरच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण पूर्णपणे काढावे, तसेच त्याची साफसफाई करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

...

गुन्हे दाखल करण्याची सूचना

मायनरलगतचे अतिक्रमण सात दिवसात काढून मायनर माेकळा करण्यात यावा. अतिक्रमण न काढल्यास, अवैध बांधकाम करून शासकीय जमीन व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९६७ अन्वये अतिक्रमणधारकांवर फाैजदारी गुन्हा नाेंदविण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख त्या नाेटिसीमध्ये करण्यात आला आहे. वास्तवात, याला १५ दिवस पूर्ण झाले असून, पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढले नाही. शिवाय, कुणावरही फाैजदारी गुन्हे दाखल केले नाहीत.