शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पुलाला संरक्षण कठडे लावणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST

पारशिवनी : नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे पुरात वाहून गेले. या पुलावरून वाहनांची सतत ...

पारशिवनी : नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे पुरात वाहून गेले. या पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने संरक्षक कठड्यांअभावी या पुलावर माेठा अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने संरक्षक कठडे लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप या भागातील वाहनचालकांनी केला आहे.

ऑगस्टमध्ये संततधार पावसामुळे पेंच जलाशय भरल्याने त्यातील पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पेंच नदीला पूर आल्याने नयाकुंड शिवारातील या नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले तर याच नदीवरील माहुली शिवारातील पूल खचला. त्यामुळे सावनेर, पारशिवनी व रामटेक तालुक्याला जाेडणारा नयाकुंड शिवारातील एकमेव पूल शिल्लक राहिल्याने या पुलावरून रहदारी वाढली आहे. पुरामुळे हा पूल खराब झाल्याने त्याची दुरुस्ती करणेही गरजेचे आहे.

या पुलाच्या दाेन्ही बाजूला वळण असल्याने वाहनचालकांना पूल लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात भरधाव वाहन चालकाचा ताबा सुटून पुलावरून नदीत काेसळून माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या पुलाजवळ विद्युत दिव्यांची काेणतीही व्यवस्था नाही. शिवाय, दाेन्ही बाजूंनी साधे सूचनाफलकही लावले नाहीत. ही बाब नागरिकांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, त्यांनी यावर अद्याप काेणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते असंबद्ध उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. परिणामी, या पुलावरील अपघात टाळण्यासाठी येथे तातडीने संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी पारशिवनीच्या नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, दीपक शिवरकर, सागर सायरे, राहुल ढगे, अनिता भड, आशिष भड, अज्जू पठाण, शेखर शेरकी, अनिकेत निंबाेने यांच्यासह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.