शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

पुलाला संरक्षण कठडे लावणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST

पारशिवनी : नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे पुरात वाहून गेले. या पुलावरून वाहनांची सतत ...

पारशिवनी : नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे पुरात वाहून गेले. या पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने संरक्षक कठड्यांअभावी या पुलावर माेठा अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने संरक्षक कठडे लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप या भागातील वाहनचालकांनी केला आहे.

ऑगस्टमध्ये संततधार पावसामुळे पेंच जलाशय भरल्याने त्यातील पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पेंच नदीला पूर आल्याने नयाकुंड शिवारातील या नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले तर याच नदीवरील माहुली शिवारातील पूल खचला. त्यामुळे सावनेर, पारशिवनी व रामटेक तालुक्याला जाेडणारा नयाकुंड शिवारातील एकमेव पूल शिल्लक राहिल्याने या पुलावरून रहदारी वाढली आहे. पुरामुळे हा पूल खराब झाल्याने त्याची दुरुस्ती करणेही गरजेचे आहे.

या पुलाच्या दाेन्ही बाजूला वळण असल्याने वाहनचालकांना पूल लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात भरधाव वाहन चालकाचा ताबा सुटून पुलावरून नदीत काेसळून माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या पुलाजवळ विद्युत दिव्यांची काेणतीही व्यवस्था नाही. शिवाय, दाेन्ही बाजूंनी साधे सूचनाफलकही लावले नाहीत. ही बाब नागरिकांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, त्यांनी यावर अद्याप काेणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते असंबद्ध उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. परिणामी, या पुलावरील अपघात टाळण्यासाठी येथे तातडीने संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी पारशिवनीच्या नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, दीपक शिवरकर, सागर सायरे, राहुल ढगे, अनिता भड, आशिष भड, अज्जू पठाण, शेखर शेरकी, अनिकेत निंबाेने यांच्यासह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.