शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

‘बोईंग एमआरओ’ केव्हा सुरू होणार?

By admin | Updated: May 16, 2014 00:42 IST

शिवणगावातील पुनर्वसन यादीत निर्माण झालेला घोळ अद्यापही सुटलेला नाही. संपूर्ण गावाने यादीवरच आक्षेप घेतल्याने, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी निघण्याची चिन्हे सध्यातरी धूसर ....

 

मोरेश्‍वर मानापुरे - नागपूर

शिवणगावातील पुनर्वसन यादीत निर्माण झालेला घोळ अद्यापही सुटलेला नाही. संपूर्ण गावाने यादीवरच आक्षेप घेतल्याने, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी निघण्याची चिन्हे सध्यातरी धूसर झाली आहेत. पुनर्वसन नाही तर टॅक्सी-वे नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतल्याने एअर इंडिया आणि बोईंगचा एमआरओ केव्हा सुरू होणार, या प्रश्नावर अधिकार्‍यांनी मौन पाळले आहे.

भारतीय उपखंडातील एक अत्याधुनिक प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची गणना होत असून, यामध्ये बी-७३७ एस, बी-७७७ एस आणि बी-७८७ ड्रीमलायनर विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होईल. करारानुसार एअर इंडियाला या ठिकाणी मोफत सेवा पुरविली जाणार आहे.

केसकरांची फेब्रुवारीत पाहणी

सुमारे ५0 एकर जागेवर ५५0 कोटी रुपये गुंतवणुकीतून उभा होणारा बोईंग एमआरओ लवकरच सुरू होईल, असे वक्तव्य बोईंग इंडियाचे अध्यक्ष आणि बोईंग इंटरनॅशनल ट्रेडिंगचे उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी नागपुरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बोईंगच्या पाहणीदरम्यान केले होते. कामात येणारे अडथळे शासनाने तातडीने सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. पण शासनाने अडथळे सोडविण्यात तत्परता न दाखविल्याने टॅक्सी रन-वे अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही. शिवणगाववासीयांनी शासनाचे पुनर्वसन प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून टॅक्सी-वेचे काम थांबविले आहे. एमआरओ प्रकल्पाचे काम मार्च २0१३ पर्यंत पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी गेल्या वर्षी म्हटले होते.

शिवणगाववासीयांचे आंदोलन

शिवणगावच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बोईंग-वे चे काम बंद पाडले. आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच काम सुरू करू देऊ, असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला आहे. राहत्या घरमालकाची सिटी सर्वेमध्ये नोंद व्हावी, अशी गावकर्‍यांची मागणी आहे. पुनर्वसन करण्यासाठी शासनाने आखीव पत्रिकेतील रहिवासी नावाचा वाद जाणीवपूर्वक उपस्थित केल्याचा गावकर्‍यांचा आरोप आहे. गावात राहतात (कब्जा वहिवाटदार) त्यांचेच पुनर्वसन करण्याची मिहान प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. शासन आणि गावकर्‍यांच्या भांडणात  

जमीन परत करा

शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आता दुसरी धावपट्टी होणे शक्य नाही. त्यामुळे शिवणगावच्या जमिनी शासनाने परत कराव्यात, अशी मागणी मिहान प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे यांनी केली आहे. शासनाने अल्पशा मोबदल्यात २00२ मध्ये जमिनीचा ताबा घेतला. त्या जमिनीवर उद्योग सुरू झालेले नाहीत. लाखोंना रोजगार मिळतील, अशा घोषणा हवेतच राहिल्या. युवकांना मिळालेला रोजगारही वीजप्रश्नामुळे हिरावून घेण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅक्सी-वे’चे काम अपूर्ण : पुनर्वसनावर गावकरी ठाम ‘टॅक्सी-वे’चे काम रखडले आहे. हा प्रश्न निकाली निघाल्यास मिहान शायनिंग होणार आहे. निर्णयानुसार यादीचे नव्याने सर्वेक्षण झालेले नाही.