शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

कालडोंगरी बेड्यावरील ७४ मुलांना शाळेत प्रवेश कधी मिळणार ?()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST

नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. ...

नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. पण या मुलांना शाळेने दाखल करून घेतले नाही. एकीकडे कुणीही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी मोहीम राबविण्यात येते. अशात ७४ बालके शोधूनही शाळेत दाखल केले नाही, या बालकांचे काय चुकले, असा सवाल बालरक्षकांनी केला आहे.

पटसंख्येच्या अभावी सरकारी शाळा बंद पडत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालके शाळाबाह्य आहेत. कालडोंगरी परिसरातील बेड्यावरील ७४ मुले बालरक्षक प्रसेनजित गायकवाड आणि माधुरी सेलोकर यांनी महिनाभर प्रयत्न करून शोधली आणि त्यांच्या जन्माच्या नोंदींसह यादी रामा जोगराणा यांच्याकरवी केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत कालडोंगरी जि.प. प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यासाठी दिली. मागील महिन्यात मुलांना आणि पालकांना प्रवेशासाठी शाळेत उपस्थित केले. त्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांनी मुलांना शाळेत दाखल करीत असल्याचे नाटक केले. परंतु दुसरेच दिवशी गावातील पालक विरोध करीत असल्याचे सांगून, सदर मुलांना शाळेत प्रवेश देता येणार नसल्याचे सांगितले.

मुलांना शाळेत प्रवेश देण्यासंदर्भात स्थानिक पालकांना काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी बालरक्षक गायकवाड यांनी समन्वय सभा घेऊन पालक, शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांना शाळाबाह्य मुलांच्या शाळाप्रवेशाची कायदेशीर बाजू समजावून सांगितली. या मुलांना तात्काळ प्रवेश देण्यासाठी विनंती केली. लगेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. शिक्षणाधिकारी यांनी लगेच पत्र काढून गटशिक्षणाधिकारी यांना सूचित केले. तथापि, अजूनही या शाळाबाह्य मुलांचा शाळाप्रवेश झाला नाही.

- आरटीईच्या कायद्यानुसार एकही मूल शाळाबाह्य राहू नये. त्यानुसार शिक्षक व मुख्याध्यापकांनी कार्य करणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या परिसरातील शाळाबाह्य मुले शोधून त्यांना तात्काळ प्रवेश देणे गरजेचे आहे. कुणाच्या दबावात मुख्याध्यापक या मुलांना प्रवेश देत नसेल तर शिक्षण विभागाने अशा मुख्याध्यापकांचे प्रबोधन करावे. त्यांचे कार्य समजवून सांगावे.

प्रसेनजित गायकवाड, बालरक्षक

- आम्ही मुलांना शाळेपर्यंत घेऊन गेलो. त्यांच्या जन्मतारखेचे दाखले मुख्याध्यापकांना दिले. पण मुलांना प्रवेशित करून घेतले नाही. या मुलांनाही शैक्षणिक सोयी-सवलती मिळाव्यात, त्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ, गणवेश, पुस्तके मिळावेत, ही मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, अशी आमची अपेक्षा आहे.

रामा जोगराणा, सामाजिक कार्यकर्ते