शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाची दुरुस्ती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल-राजाेली-काेदामेंढी हा मार्ग २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी या मार्गाची दैनावस्था झाली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल-राजाेली-काेदामेंढी हा मार्ग २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी या मार्गाची दैनावस्था झाली असून, खड्ड्यांमुळे त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. शिवाय, अपघाताचा आलेखही चढता आहे. राेडवरील खड्डे माेठ्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता बळावल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

धर्मापुरी, तांडा, मोरगाव, रेवराल, खंडाळा, पिपरी, आष्टी, नवरगाव, चारभा, राजोली, नांदगाव, कोदामेंढी, सुंदरगाव, मांगली (तेली), आजनगाव, धामणगाव, निमखेडा, अरोली यासह एकूण २५ गावांमधील नागरिक व विद्यार्थी रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाचा वापर माैदा शहरासह अन्य गावांमध्ये ये-जा करण्यासाठी करतात. त्यांना रहदारीसाठी या मार्गाला पर्यायी राेड नाही. प्रशासनाने या मार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेतले हाेते. मात्र, ते मध्येच बंद करण्यात आले. माैदा-काेदामेंढीपर्यंतच्या राेडच्या कामाला मंजुरी नसल्याने ते बंद करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागातील जाणकार व्यक्तींनी दिली.

राजोली, रेवराल, चारभा, पिपरी, सुंदरगाव, मांगली (तेली) येथील नागरिक रोज एनटीपीसीमध्ये कामाला, तसेच मौदा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी दवाखान्यात व इतर कामांसाठी याच रस्त्याने जातात. दरम्यान, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, राजोलीच्या सरपंच मीना तांडेकर, उपसरपंच काशीनाथ पोटभरे यांच्यासह नागरिकांनी केली. या राेडवरील अपघाताची नैतिक जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गाेडबाेले यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

राेडवरील खड्डे जिवावर उठले

या राेडवर सर्वत्र छाेटे-माेठे खड्डे तयार झाले आहेत. शिवाय, राेडच्या दाेन्ही बाजूंचे डांबरीकरण दबले गेले आहे. त्यामुळे हा राेड उंच सखल झाला आहे. रुंद व खाेल खड्डे, राेडवर विखुरलेली गिट्टी अपघातास कारणीभूत ठरत आहे. या राेडवर दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये चारचाकी वाहने गेल्यास इंजिनचा भाग जमिनीला लागताे. त्यामुळे अपघातांसाेबत वाहनांचेही नुकसान हाेत असल्याने राेडवरील खड्डे वाहनचालकांच्या जिवावर उठले आहेत.