शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा

By admin | Updated: May 13, 2014 00:22 IST

नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा येतील, अशी शंका विख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी सोमवारी व्यक्त केली.

नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा येतील, अशी शंका विख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी सोमवारी व्यक्त केली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित मीट द प्रेस कार्यक्र मात त्या बोलत होत्या.

मोदी हे कॉर्पोरेट क्षेत्राचे उमेदवार असल्याने ते त्यांचाच कार्यक्रम राबवतील. काँग्रेस व भाजप यासारख्या मोठय़ा पक्षांना कॉर्पोरेट क्षेत्रातून निधी मिळत आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेत आल्यास ते भांडवलदारांच्या इशार्‍यावर चालतील, अशी शंका रॉय यांनी व्यक्त केली. केंद्रात मजबूत सरकार सत्तेत आले तर ते एककल्ली वागेल. मजबूत सरकार आले तर लोकांना समस्या मांडता येतील, त्यांना न्याय मिळेल. सामाजिक आंदोलनातील कार्यक र्त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघेल का, असे विचारता यावर ठाम मत मांडता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी नक्षलवादी असल्याचे भासवून साईबाबा यांच्या नावे बोगस वॉरंट काढले. त्यांच्या घराची झडती घेतली. यात संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आता सहा महिन्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई संशयास्पद आहे. माओवाद्याकडून होत असलेला हिंसाचार सर्मथनीय नाही. परंतु या हिंसाचाराच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

छत्तीसगडमधील हजारो आदिवासींना कारागृहात टाकण्यात आले आहे. नक्षलवादी हे आदिवासीच असल्याने नक्षलवादाचा शोध घेण्याची गरज असल्याचे रॉय यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.(प्रतिनिधी)

निवडणुकीनंतरही बदल नाही

आज सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. दुसरीकडे विकास दर वाढत असल्याचा दावा केला जात आहे. जोपर्यंत स्थानिकांना विकास प्रक्रि येत सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत विकास शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर देशातील परिस्थितीत फारसा बदल होणार नसल्याचे मत रॉय यांनी व्यक्त केले.