शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तिच्या मरणयातना संपणार केव्हा ?

By admin | Updated: May 30, 2017 01:37 IST

लहानपणापासून तिला आयुष्याकडून मिळाल्या त्या यातनाच. घरात अठराविश्वे दारिद्र्य. जगण्याचा संघर्ष करताना शिक्षणाची इच्छा नाहीशी झाली.

मुलांना जगविण्यासाठी एचआयव्ही पीडित मातेची तळमळ : नशीबात तिरस्काराचे अमानवीय भोग निशांत वानखेडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहानपणापासून तिला आयुष्याकडून मिळाल्या त्या यातनाच. घरात अठराविश्वे दारिद्र्य. जगण्याचा संघर्ष करताना शिक्षणाची इच्छा नाहीशी झाली. औरंगाबादमध्ये सुधारगृहात दिवस काढताना अधीक्षिकेने एका व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर आयुष्य पालटणार असा विचार करताना काही दिवस सुखाचे गेले. परंतु पतीच्या व्यभिचारी वृत्तीमुळे पुढे आयुष्याची धूळधाण झाली. त्याच्याकडून तिला सुखाऐवजी मिळाला तो ‘एड्स’ नावाचा गंभीर आजार. यातून नातेवाईक आणि समाजाकडून मिळाली अमानवीय घृणा आणि तिरस्कार. या यातना भोगताना मरण जवळ करावे असे तिला वाटलेही. मात्र पोटच्या दोन मुलांसाठी तिला जगायचे आहे. दु:ख उरात भरूनही मुलांना जगविण्यासाठी, शिकविण्यासाठी या मातेची तळमळ मन हेलावणारी आहे. संवेदनशील समाजाकडून तिला मदतीची आस आहे. मनाला चटका लावणारी ही वेदनादायी कथा शुभांगीची (नाव बदल) आहे. तिचे माहेर नागपूरचे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे हुशार असूनही तिला शिकता आले नाही. खेळण्या-बागडण्याच्या वयात आईसोबत लोकांच्या घरी धुणीभांडी आणि मिळेल ते काम करून पोटाची खळगी भागवणे एवढेच तिला ठाऊक. तरुण वयात एक मुलासोबत तिचे प्रेमही झाले. मात्र त्याने लग्नास नकार दिला व त्यामुळे आजीने तिला नागपुरातील बालसुधारगृहात घातले. तिला शिकण्याची इच्छा होती. तिने नागपुरातून दुसरीकडे पाठविण्याची विनंती केली. येथून तिला औरंगाबादच्या सुधारगृहात पाठविण्यात आले. येथे तीन वर्षे तिने घालविली. यादरम्यान सुधारगृहात मिळणाऱ्या असुविधांची तक्रार केल्यामुळे अधीक्षिकेला राग आला. शुभांगीला हाकलण्याच्या प्रयत्नात अधीक्षिकेने थेट तिच्या मनाविरुद्ध एका व्यापारी कुटुंबात तिचे लग्न लावून दिले. पतीसोबत काही दिवस सुखात गेल्यामुळे आता वाईट दिवस संपले असे तिच्या मनाला वाटले. यादरम्यान तिला मुलगा झाला. मात्र वर्ष-दीड वर्षात हे दिवस संपून आयुष्यात नव्या यातना सुरू झाल्यात आणि यावेळी या दु:खाचे रूप अधिक तीव्र होते. पतीला व्यभिचाराची सवय जडली आणि यातून एका भयंकर आजाराला आमंत्रण दिले. तो एचआयव्ही बाधित झाला. यादरम्यान पत्नीसोबत संपर्क केल्याने तिलाही याची लागण झाली. २००८ साली या आजाराची माहिती तिला कळली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. या आजारातून मोठा मुलगा सुरक्षित राहिला, परंतु पती-पत्नीसमवेत लहान मुलगी या आजाराच्या विळख्यात सापडली. यानंतर मात्र शुभांगीच्या यातनांनी कळस गाठला. आधी गरिबीचा संघर्ष होता, पण लोक प्रेमाने जवळ घ्यायचे. मात्र एचआयव्ही बाधित असल्याने सुरुवातीला कुटुंबीयांनी व नंतर समाजानेही त्यांचा तिरस्कार सुरू केला. सुरक्षित असलेल्या मोठ्या मुलासकट त्यांना घृणेच्या नजरेने पाहिले जाऊ लागले. कुणी जवळ येऊन मदत करायला तयार नाही. परिस्थिती इतकी विदारक होती, की रात्री घरातील खरकटे खाऊन पती व मुलांसोबत दिवस काढण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. अशा मरणयातना भोगताना तिने एक दिवस झोपेच्या गोळ््या खाऊन मृत्यू जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला तिच्या वेदना संपवायच्या नव्हत्या. ती वाचली दु:खाचे डोंगर फोडण्यासाठी. आजाराने पती खंगला आहे. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आहे. अशावेळी औरंगाबाद सोडून तिने नागपूरला माहेर गाठले. अंथरुणावर खिळलेल्या पतीलाही सोबत आणले. माहेरी आली असली तरी तसाच तिरस्कार व तशीच घृणा तिला अजूनही भोगावी लागत आहे. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी ती काम करण्यास तयार आहे, मात्र कुणी काम देईनात. कुणी मदत करण्यास तयार नसल्याने एक वेळच्या अन्नासाठीही तिला संघर्ष करावा लागत आहे. या पराकोटीच्या वेदनांमुळे ती असाहाय्य झाली आहे. मात्र आपल्या चिमुकल्यांना चांगले भविष्य देण्याची जिद्द तिने सोडली नाही. ही जगण्याची धडपड करताना तिने लोकमतकडे मदतीची याचना केली आहे. संवेदनशील नागरिकांनी व संघटनांनी तिच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. तिला मदत करण्यासाठी ८९८३८४२६१८ या क्रमांकावर संपर्क क रून आपली मदत पोहचविल्या जाऊ शकते. मोठा मुलगा सुरक्षितया आजारातून तिचा मोठा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. ११ वर्षांचा हा मुलगा अभ्यासात हुशार आहे. एवढेच नाही तर त्याची चित्रकला कुणालाही मोहून टाकेल एवढी सुरेख आहे. मात्र आईवडिलांच्या नियतीमुळे त्याचेही आयुष्य अंधारमय होईल का, ही भीती त्या मातेला वाटत आहे.