शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांनी तर मुख्यमंत्री असताना विकास मंडळांचा वैधानिक दर्जा घालविला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

नागपूर : विदर्भ व मराठवाडा विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही अडथळा आणलेला नाही. तर देवेंद्र ...

नागपूर : विदर्भ व मराठवाडा विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही अडथळा आणलेला नाही. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विकास मंडळाचा वैधानिक दर्जा घालविला गेला. त्याला कमजोर केले. आता फडणवीसांनी मिळेल त्या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी विदर्भाचा वापर करू नये. त्यांचे विदर्भ प्रेम जनतेने पाहिले आहे, असा चिमटा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काढला.

विकास मंडळाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना शुक्रवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी समोर येत सडेतोड उत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, राज्यघटनेतील तरतुदीनुसार विकास मंडळांची रचना करण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत. ते महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेऊन विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवूनही त्यांनी ती मंजूर केली नाही. ते विशेष अधिकार असल्याचे सांगतात. हाच अधिकार वापरून ते विकास मंडळांना पुनरुज्जीवित का करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे विदर्भाबाहेरील असले तरी विदर्भाचा मंत्री म्हणून विदर्भ विकासाच्या प्रश्नावर आपण मंत्रिमंडळातही रोखठोक भूमिका मांडत असतो. या सरकारमध्ये मंत्र्यांचा आवाज दाबला जात नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.

विदर्भ व मराठवाड्याच्या वीज सवलतीसाठी दिल्या जाणाऱ्या बाराशे कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये एकट्या जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगांना दिले जात होते. तर वर्ध्यातील एका स्टील उद्योगाला तब्बल १०० कोटी जायचे. हा प्रकार लक्षात आल्यावर स्थगिती देऊन एक समिती नेमण्यात आली. ही समिती लवकरच अहवाल देईल व त्यानुसार पुढील महिन्यात उद्योगांना वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. फडणवीस यांना विदर्भाच्या सिंचनाची एवढी चिंता आहे तर त्यांनी केंद्रात व राज्यात सरकार असतानाही गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प का पूर्ण केला नाही. उलट विदर्भ विकासाच्या नावावर त्यांनी रामदेवबाबांसारखे उद्योजक पोसले, अशी टीकाही त्यांनी केली.

बॉक्स

राज्यपालांसोबत राष्ट्रपतींची भेट का घेत नाहीत?

- फडणवीस हे ऊठसूट राज्यपालांची भेट घेत असतात. मग विकास मंडळांचा आदेश काढण्यासाठी ते राज्यपालांना सोबत घेऊन दिल्लीत राष्ट्रपतींची भेट का घेत नाहीत, असा सवालही राऊत यांनी केला. एप्रिल २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या मंडळांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. ती संपल्यानंतर मुदतवाढ मिळाली नाही. फडणवीस यांनी आपले दिल्लीतील वजनही या कामासाठी वापरावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.