शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

फडणवीसांनी तर मुख्यमंत्री असताना विकास मंडळांचा वैधानिक दर्जा घालविला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

नागपूर : विदर्भ व मराठवाडा विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही अडथळा आणलेला नाही. तर देवेंद्र ...

नागपूर : विदर्भ व मराठवाडा विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही अडथळा आणलेला नाही. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विकास मंडळाचा वैधानिक दर्जा घालविला गेला. त्याला कमजोर केले. आता फडणवीसांनी मिळेल त्या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी विदर्भाचा वापर करू नये. त्यांचे विदर्भ प्रेम जनतेने पाहिले आहे, असा चिमटा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काढला.

विकास मंडळाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना शुक्रवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी समोर येत सडेतोड उत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, राज्यघटनेतील तरतुदीनुसार विकास मंडळांची रचना करण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत. ते महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेऊन विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवूनही त्यांनी ती मंजूर केली नाही. ते विशेष अधिकार असल्याचे सांगतात. हाच अधिकार वापरून ते विकास मंडळांना पुनरुज्जीवित का करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे विदर्भाबाहेरील असले तरी विदर्भाचा मंत्री म्हणून विदर्भ विकासाच्या प्रश्नावर आपण मंत्रिमंडळातही रोखठोक भूमिका मांडत असतो. या सरकारमध्ये मंत्र्यांचा आवाज दाबला जात नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.

विदर्भ व मराठवाड्याच्या वीज सवलतीसाठी दिल्या जाणाऱ्या बाराशे कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये एकट्या जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगांना दिले जात होते. तर वर्ध्यातील एका स्टील उद्योगाला तब्बल १०० कोटी जायचे. हा प्रकार लक्षात आल्यावर स्थगिती देऊन एक समिती नेमण्यात आली. ही समिती लवकरच अहवाल देईल व त्यानुसार पुढील महिन्यात उद्योगांना वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. फडणवीस यांना विदर्भाच्या सिंचनाची एवढी चिंता आहे तर त्यांनी केंद्रात व राज्यात सरकार असतानाही गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प का पूर्ण केला नाही. उलट विदर्भ विकासाच्या नावावर त्यांनी रामदेवबाबांसारखे उद्योजक पोसले, अशी टीकाही त्यांनी केली.

बॉक्स

राज्यपालांसोबत राष्ट्रपतींची भेट का घेत नाहीत?

- फडणवीस हे ऊठसूट राज्यपालांची भेट घेत असतात. मग विकास मंडळांचा आदेश काढण्यासाठी ते राज्यपालांना सोबत घेऊन दिल्लीत राष्ट्रपतींची भेट का घेत नाहीत, असा सवालही राऊत यांनी केला. एप्रिल २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या मंडळांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. ती संपल्यानंतर मुदतवाढ मिळाली नाही. फडणवीस यांनी आपले दिल्लीतील वजनही या कामासाठी वापरावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.