शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

दीक्षाभूमीसाठी स्पेशल ट्रेनची घोषणा कधी?

By admin | Updated: October 12, 2015 02:44 IST

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून बौद्ध बांधव नागपुरात दीक्षाभूमीवर येतात.

सोहळा नऊ दिवसावर : लवकर निर्णय घेण्याची गरजनागपूर : दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून बौद्ध बांधव नागपुरात दीक्षाभूमीवर येतात. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. परंतु हा सोहळा अवघा नऊ दिवसांवर आलेला असताना अद्यापही रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागपुरात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दरवर्षी देशभरातून हजारो भाविक येतात. त्यामुळे या काळात चारही दिशांनी येणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रचंड गर्दीचे चित्र पाहावयास मिळते. यात मुंबईकडून असंख्य भाविक नागपुरात येतात. मुंबई मार्ग आधीच वर्षभर व्यस्त राहतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करीत असते. परंतु या वर्षी धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा नऊ दिवसांवर येऊन ठेपला असताना रेल्वे प्रशासनाने अद्याप विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केलेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आणि त्याबाबतची प्रसिद्धी प्रसारमाध्यमात झाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्रवाशांना कळते. त्यानंतर ते या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आपले आरक्षण करतात. एकीकडे रेल्वे प्रशासन योग्य दराचे तिकीट काढून प्रवास करा, असा आग्रह धरते आणि दुसरीकडे ऐनवेळी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी लवकर विशेष रेल्वेगाड्या जाहीर करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)