शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जिल्हा बँकेला परवाना कधी ?

By admin | Updated: February 23, 2016 03:34 IST

परवाना नसलेल्या बँकांचे पुनरुज्जीवन करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत राज्य सरकार आणि जिल्हा बँकेने आवश्यक त्या

मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूरपरवाना नसलेल्या बँकांचे पुनरुज्जीवन करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत राज्य सरकार आणि जिल्हा बँकेने आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या असून आता बँकिंग परवान्याची प्रतीक्षा आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची दाट शक्यता असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. प्रकिया पूर्ण, परवाना लवकरचबँकेने आर्थिक परवाना मिळविण्याचे सर्व निकष पूर्ण केले आहे. शासनाने बँक सुरू करण्यासाठी आवश्यक १५६ कोटी ५६ लाख रुपये बँकेला दिले आहेत. एकूण रकमेपैकी १३१ कोटी ७४ लाख रुपये मार्च २०१५ ला आणि नाबार्डच्या तपासणीनंतर आवश्यक उर्वरित २४ कोटी ८२ लाख रुपये १८ नोव्हेंबर २०१५ रोजी दिले आहेत. यात केंद्र शासनाचा ५२ कोटी ७१ लाख, राज्याचा ९० कोटी ६८ लाख आणि नाबार्डचा १३ कोटी १७ लाख रुपये वाटा आहे. अखेरचा हप्ता १८ नोव्हेंबरला दिल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस नाबार्डच्या विभागीय कार्यालयाने तपासणी केली. नाबार्डने अहवाल मुंबईतील मुख्य कार्यालयाला पाठविला. त्यानंतर मुख्य कार्यालयाने हा अहवाल नागपुरातील रिझर्व्ह बँकेकडे सोपविला. तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने अहवाल अंतिम निर्णयासाठी मुंबईतील रिझर्व्ह बँकेला दिला. या प्रक्रियेला नोव्हेंबरपासून जवळपास साडेतीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. सध्या बँक बँकिंग परवान्याच्या प्रतिक्षेत आहे. आज, उद्या केव्हाही परवाना मिळू शकतो, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणारबँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत २ टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.रिझर्व्ह बँकेने २५ जुलै २०१४ रोजी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारावर बंदी टाकली होती, पण आवश्यक देवाणघेवाणचे व्यवहार सुरू होते. ३१ जानेवारी २०१६ पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती ४७ टक्के सीआरएआर (३१ मार्च २०१५)४३.५० लाख ठेवीदार४८७६ कोटी ठेवी४३१.७० कोटी नेटवर्थ४५०५.६० कोटी गुंतवणूक४६१६.५६ कोटींचे कर्जवाटप (४५०.७९ कोटी कृषी कर्ज, १६५.७७ कोटी इतर कर्ज)४८४ शाखा, सर्व शाखा सीबीएस४परवान्यानंतर एटीएम सेवा देणार