शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

By admin | Updated: November 18, 2016 03:06 IST

देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे.

वातावरण तापले : धनदांडग्यांच्या कर्जमाफीनंतर टीकास्त्रउमरेड : देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे. सोबतच सरकारवरही ग्रामीण भागातून टीकास्त्र सोडले जात असून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा सवाल आता यानिमित्ताने विचारला जात आहे. सरकार आणि बँका केवळ धनाढ्यांचाच विचार करीत असेल तर हे योग्य नाही. बँक आणि सरकारने उद्योगपतींच्या या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.उद्योगपतींच्या कर्जमाफी निर्णयावर प्रतिक्रिया घेतल्या असता, उमरेड पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर म्हणाले, शेतकरी - शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी यांना एकीकडे रांगेत लावायचे आणि दुसरीकडे उद्योगपतींना कर्जमाफी द्यायची. सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करणारे हे सरकार आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य असला तरी नियोजनशून्य परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे, असेही ते म्हणाले. युवा नेते राजू पारवे म्हणाले, मोलमजुरी बुडवून बँकेत हजार - दोन हजार मिळतील या आशेने अनेकांचा दिवस वाया जात आहे. त्यातही पैसे मिळतील की नाही याचा नेमही राहिला नाही. एकीकडे असंख्य शेतकऱ्यांची खाती असलेल्या जिल्हा बँकेलाही पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी मनाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर खानोरकर यांनीही कर्जमाफीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते तर भविष्यातील आत्महत्या तरी थांबल्या असत्या. रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या शेतकरी - शेतमजुरांचे हे सरकार राहिले नाही तर ‘एसी वाल्या’ धनदांडग्यांचे झालेले आहे, असाही घणाघात त्यांनी केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विलास झोडापे यांनीही हा अतिशय चुकीचा निर्णय असून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. शेतकरी - शेतमजुरांनी कोणत्याही अपेक्षा ठेवू नये. भांडवलदारांचेच शासन आहे. आज ना उद्या हा निर्णय होणारच होता; तो झाला. सरकार प्रत्येक निर्णयाला देशभक्तीसोबत जोडून तरुणांची डोकी भडकविण्याचे काम करीत असल्याचाही आरोप झोडापे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)