शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

By admin | Updated: November 18, 2016 03:06 IST

देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे.

वातावरण तापले : धनदांडग्यांच्या कर्जमाफीनंतर टीकास्त्रउमरेड : देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे. सोबतच सरकारवरही ग्रामीण भागातून टीकास्त्र सोडले जात असून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा सवाल आता यानिमित्ताने विचारला जात आहे. सरकार आणि बँका केवळ धनाढ्यांचाच विचार करीत असेल तर हे योग्य नाही. बँक आणि सरकारने उद्योगपतींच्या या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.उद्योगपतींच्या कर्जमाफी निर्णयावर प्रतिक्रिया घेतल्या असता, उमरेड पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर म्हणाले, शेतकरी - शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी यांना एकीकडे रांगेत लावायचे आणि दुसरीकडे उद्योगपतींना कर्जमाफी द्यायची. सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करणारे हे सरकार आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य असला तरी नियोजनशून्य परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे, असेही ते म्हणाले. युवा नेते राजू पारवे म्हणाले, मोलमजुरी बुडवून बँकेत हजार - दोन हजार मिळतील या आशेने अनेकांचा दिवस वाया जात आहे. त्यातही पैसे मिळतील की नाही याचा नेमही राहिला नाही. एकीकडे असंख्य शेतकऱ्यांची खाती असलेल्या जिल्हा बँकेलाही पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी मनाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर खानोरकर यांनीही कर्जमाफीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते तर भविष्यातील आत्महत्या तरी थांबल्या असत्या. रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या शेतकरी - शेतमजुरांचे हे सरकार राहिले नाही तर ‘एसी वाल्या’ धनदांडग्यांचे झालेले आहे, असाही घणाघात त्यांनी केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विलास झोडापे यांनीही हा अतिशय चुकीचा निर्णय असून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. शेतकरी - शेतमजुरांनी कोणत्याही अपेक्षा ठेवू नये. भांडवलदारांचेच शासन आहे. आज ना उद्या हा निर्णय होणारच होता; तो झाला. सरकार प्रत्येक निर्णयाला देशभक्तीसोबत जोडून तरुणांची डोकी भडकविण्याचे काम करीत असल्याचाही आरोप झोडापे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)