शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गहू, हरभऱ्याचे भाव काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST

ब्रिजेश तिवारी काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याच्या पिकाची मळणी केली असून, हे दाेन्ही शेतमाल ...

ब्रिजेश तिवारी

काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याच्या पिकाची मळणी केली असून, हे दाेन्ही शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. परंतु, या दाेन्ही शेतमालाला बाजारात केंद्र शासनाने यावर्षी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीएवढाही भाव मिळत नाही. दुसरीकडे, शासनाने या दाेन्ही शेतमालांची खरेदीदेखील अद्याप सुरू केली नाही. त्यामुळे माेठे नुकसान हाेत असल्याची माहिती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दिली.

यावर्षीच्या खरीप हंगामात प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, कीड व राेगांचा प्रादुर्भाव यामुळे दाेन्ही तालुक्यातील साेयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय, गुलाबी बाेंडअळी आणि बाेंडसडमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अंबिया बहाराचा संत्रा कवडीमाेल भावाने विकला गेला तर मृग बहाराच्या संत्र्याची दाेन्ही तालुक्यातील ८५ टक्के बागांमध्ये फलधारणाही फारशी नव्हती. त्यामुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या रब्बीच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले हाेते.

सुरुवातीच्या काळात या दाेन्ही पिकांची अवस्था चांगली हाेती. तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी या पावसामुळे दाेन्ही पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे दाेन्ही शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली हाेती. शेतकऱ्यांनी दाेन्ही शेतमाल मळणी करून बाजारात विकायला आणला असता, गव्हाला प्रति क्विंटल १,६०० ते १,७०० रुपये आणि हरभऱ्याला प्रति क्विंटल ४,००० रुपये ते ४,७०० रुपये भाव मिळत आहे.

हा प्रकार स्थानिक लाेकप्रतिनिधी व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहीत असूनही कुणीही बाेलत नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. बाजारात गहू व हरभरा उत्पादकांची आर्थिक लूट हाेत असल्याने ही लूट थांबवावी आणि केंद्र व राज्य शासनाने दाेन्ही तालुक्यांमध्ये गहू व हरभरा खरेदी केंद्र तातडीने सुरू करून या दाेन्ही शेतमालांची माेठ्या प्रमाणात खरेदी करावी अशी मागणीही मासाेद (ता. काटाेल) येथील प्रकाश बारंगे, रिंगणाबाेडी (ता. काटाेल) येथील संजय नागपुरे यांच्यासह काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

....

‘एमएसपी’चा उपयाेग काय?

केंद्र शासनाने सन २०२१-२२ या रब्बी हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल १,९७५ रुपये तर हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,१०० रुपये जाहीर केली आहे. गव्हाला बाजारात १,६०० ते १,७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल २७५ ते ३७५ रुपयांचे तर हरभऱ्याला प्रति क्विंटल ४,००० रुपये ते ४,७०० रुपये भाव मिळत असल्याने ४०० ते १,१०० रुपयांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे ‘एमएसपी’चा उपयाेग काय, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

शासकीय खरेदीचा तिढा

शासनाच्यावतीने दाेन्ही तालुक्यांमध्ये केवळ हरभऱ्याची खरेदी केली जात असून, गव्हाची खरेदी केली जात नाही. या हंगामात काटाेल व नरखेड येथे हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा शासनाने केली असून, ऑनलाईन नाेंदणीही प्रक्रियादेखील सुरू केली. वास्तवात, खरेदी केंद्र सुरूच करण्यात आले नाही. शासनाने ही खरेदी केंद्र सुरू न केल्याने बाजारातील स्पर्धा कमी झाल्याचा आराेपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.