शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

गहू, हरभऱ्याचे भाव काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST

ब्रिजेश तिवारी काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याच्या पिकाची मळणी केली असून, हे दाेन्ही शेतमाल ...

ब्रिजेश तिवारी

काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याच्या पिकाची मळणी केली असून, हे दाेन्ही शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. परंतु, या दाेन्ही शेतमालाला बाजारात केंद्र शासनाने यावर्षी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीएवढाही भाव मिळत नाही. दुसरीकडे, शासनाने या दाेन्ही शेतमालांची खरेदीदेखील अद्याप सुरू केली नाही. त्यामुळे माेठे नुकसान हाेत असल्याची माहिती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दिली.

यावर्षीच्या खरीप हंगामात प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, कीड व राेगांचा प्रादुर्भाव यामुळे दाेन्ही तालुक्यातील साेयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय, गुलाबी बाेंडअळी आणि बाेंडसडमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अंबिया बहाराचा संत्रा कवडीमाेल भावाने विकला गेला तर मृग बहाराच्या संत्र्याची दाेन्ही तालुक्यातील ८५ टक्के बागांमध्ये फलधारणाही फारशी नव्हती. त्यामुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या रब्बीच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले हाेते.

सुरुवातीच्या काळात या दाेन्ही पिकांची अवस्था चांगली हाेती. तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी या पावसामुळे दाेन्ही पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे दाेन्ही शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली हाेती. शेतकऱ्यांनी दाेन्ही शेतमाल मळणी करून बाजारात विकायला आणला असता, गव्हाला प्रति क्विंटल १,६०० ते १,७०० रुपये आणि हरभऱ्याला प्रति क्विंटल ४,००० रुपये ते ४,७०० रुपये भाव मिळत आहे.

हा प्रकार स्थानिक लाेकप्रतिनिधी व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहीत असूनही कुणीही बाेलत नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. बाजारात गहू व हरभरा उत्पादकांची आर्थिक लूट हाेत असल्याने ही लूट थांबवावी आणि केंद्र व राज्य शासनाने दाेन्ही तालुक्यांमध्ये गहू व हरभरा खरेदी केंद्र तातडीने सुरू करून या दाेन्ही शेतमालांची माेठ्या प्रमाणात खरेदी करावी अशी मागणीही मासाेद (ता. काटाेल) येथील प्रकाश बारंगे, रिंगणाबाेडी (ता. काटाेल) येथील संजय नागपुरे यांच्यासह काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

....

‘एमएसपी’चा उपयाेग काय?

केंद्र शासनाने सन २०२१-२२ या रब्बी हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल १,९७५ रुपये तर हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,१०० रुपये जाहीर केली आहे. गव्हाला बाजारात १,६०० ते १,७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल २७५ ते ३७५ रुपयांचे तर हरभऱ्याला प्रति क्विंटल ४,००० रुपये ते ४,७०० रुपये भाव मिळत असल्याने ४०० ते १,१०० रुपयांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे ‘एमएसपी’चा उपयाेग काय, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

शासकीय खरेदीचा तिढा

शासनाच्यावतीने दाेन्ही तालुक्यांमध्ये केवळ हरभऱ्याची खरेदी केली जात असून, गव्हाची खरेदी केली जात नाही. या हंगामात काटाेल व नरखेड येथे हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा शासनाने केली असून, ऑनलाईन नाेंदणीही प्रक्रियादेखील सुरू केली. वास्तवात, खरेदी केंद्र सुरूच करण्यात आले नाही. शासनाने ही खरेदी केंद्र सुरू न केल्याने बाजारातील स्पर्धा कमी झाल्याचा आराेपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.