शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘आप’ का क्या होगा?

By admin | Updated: July 26, 2014 02:56 IST

लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात ताकदीनिशी

कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग : सुरुवातच चुकीची झाल्याची भावनानागपूर : लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात ताकदीनिशी उतरणाऱ्या ‘आप’ने (आम आदमी पार्टी) महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका न लढण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा झाली नव्हती. परंतु सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीमुळे उपराजधानीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ‘आप’ची सुरुवातच चुकीच्या ‘ट्रॅक’वर झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.उपराजधानीत लोकसभा निवडणुकांच्या काळात ‘आप’ने चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. अंजली दमानियांना ‘आऊटसोर्स’ करून उपराजधानीत उमेदवारी देण्यात आली होती व येथील लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. परंतु लोकसभेच्या निकालानंतर ‘आप’ला अक्षरश: भगदाड पडले व अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. परंतु सुरुवातीपासून ‘आप’सोबत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. काही जणांनी आपापल्या पातळीवर तयारीदेखील सुरू केली होती. परंतु हरियाणा येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढण्याबद्दलचा निर्णय जवळपास अंतिम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित वृत्त उपराजधानीतील कार्यकर्त्यांपर्यंतदेखील पोहोचले अन् अनेक जणांचा अपेक्षाभंग झाला.‘आप’चे संयोजक देवेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप ठोस सूचना आल्या नसल्याचे स्पष्ट केले. परंतु निवडणुका लढणार नाही असे संकेत मिळाले असल्याचे मात्र त्यांनी मान्य केले. पक्षाने स्थानिक पातळीवरील निवडणुकांपासून सुरुवात करायला हवी होती. यंदा जरी निवडणुका लढल्या नाहीत तरी संघटन बांधणीचे काम करण्यावर जास्त भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ‘ट्रॅक’च चुकलायासंदर्भात ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता बहुतांश कार्यकर्त्यांनी पक्षाचा ‘ट्रॅक’च चुकला असल्याचे मत व्यक्त केले. नवीन पक्षाने सुरुवातीला संघटन बांधणीवर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असते. परंतु ‘आप’ने स्थानिक स्तरांवरील निवडणुका न लढता थेट लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकांत उडी घेतली. केजरीवाल लाटेमुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह होता, परंतु तो तेवढ्या काळापुरता मर्यादित होता. निवडणुकांनंतर आता पक्षाचे संघटनच कोसळले आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.