शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ७२ हजार अर्जांचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:07 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरकूल उपलब्ध व्हावे, यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. बेघर व गरजूंना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेने २०१६ मध्ये अर्ज मागविले होते. नागपूर शहरातील तब्बल ७२ हजार १३ लोकांनी अर्ज केले होते. या सर्वांना घरकूल मिळण्याची आशा आहे. परंतु महापालिका ही योजनाच राबविणार नसल्याने ७२ हजार अर्जांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमनपा तर योजना राबविणार नाही : म्हाडाने स्वतंत्र अर्ज मागविले : नासुप्रच्या चार योजनांत ४,५४० घरांनाच मंंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरकूल उपलब्ध व्हावे, यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. बेघर व गरजूंना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेने २०१६ मध्ये अर्ज मागविले होते. नागपूर शहरातील तब्बल ७२ हजार १३ लोकांनी अर्ज केले होते. या सर्वांना घरकूल मिळण्याची आशा आहे. परंतु महापालिका ही योजनाच राबविणार नसल्याने ७२ हजार अर्जांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणतर्फे घरकूल मागणी सर्वेक्षण आॅनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. महापालिकेने झोनस्तरावर अर्ज मागविले होते. २२ फे ब्रुवारी ते २२ मार्च २०१६ या कालावधीत ७२ हजार १३ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ४१ हजार ४७८ अर्ज कागदपत्रांसह सादर करण्यात आले होते. हे अर्ज म्हाडा व नासुप्रकडे सादर करण्यात येईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. परंतु सध्या महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधण्याचे प्रस्तावित नसल्याचे महापालिकेने माहितीच्या अधिकारात माहिती दिली आहे. यामुळे महापालिकेने गोळा केलेल्या हजारो अर्जांचे काय होणार, असा सवाल शहर विकास मंच संयोजक समितीचे अनिल वासनिक यांनी शनिवारी पत्रकारांशी चर्चा करताना केला. यावेळी डॉ. दिलीप तांबटकर, रामलाल सोमकुंवर, राजकुमार वंजारी, नितीन मेश्राम व शैलेंद्र वासनिक आदी उपस्थित होते.प्राप्त अर्जांच्या तपासणीचे काम सुरू आहे. अद्याप कुठल्याही अर्जाला मंजुरी देण्यात आलेली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर शहराकरिता अद्याप या प्रकल्पाला मंजुरी प्राप्त झालेली नाही. या योजनेसाठी प्राप्त अर्ज नासुप्र व म्हाडा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मात्र म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जाहिरात प्रकाशित केली असून स्वतंत्र अर्ज मागविले असल्याने महापालिकेकडे सादर केलेल्या अर्जांचे काय होणार, असा प्रश्न अर्जधारकांना पडला आहे.घोषणा ५० हजारांची अन् बांधकाम ५ हजारनागपूर शहरातील गरजू व गरीब लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून ५० हजार घरे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून राबविला जाणार नाही. नासुप्र व म्हाडा ही योजना राबवित आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नासुप्रतर्फे नागपूर शहरातील वाठोडा, तरोडी, वांजरी येथे ४५४० घरकुलांची योजना राबविली जात आहे. वाठोडा व तरोडी खुर्द येथील २६३८ घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. म्हाडा ६३९ घरकूल उभारणार असून याबाबतची जाहिरात काढली आहे. म्हणजेच घोषणा ५० हजार घरकुलांची करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात बांधकाम ५४७९ घरकुलांचे होत आहे.रमाई आवास योजनाही संथअनुसूचित जाती व नवबुद्धांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेतून १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत महापालिकेला ४७३७ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात चार वर्षात जेमतेम १०३१ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. या योजनेसाठी आलेल्या अर्जात मंजूर अर्जांपेक्षा नामंजूर अर्जांची संख्या मोठी आहे. या योजनेचे काम संथ असल्याने उद्दिष्टपूर्ती अजून बरीच दूर आहे.पट्टे वाटपाची प्रक्रिया संथशहरातील झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे मालकी पट्टे देण्याची योजना राज्य सरकारने हाती घेतली आहे. नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या आहेत. त्यातुल २९३ अधिकृत स्लम घोषित तर १३१ अघोषित आहेत. नासुप्र व महापालिकेच्या जागांवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांनाही या घोषणेचा लाभ होणार आहे. मात्र ही प्रक्रिया खूपच संथ आहे.

 नासुप्रकडून ३४ झोपडपट्ट्यांचा सर्वेशहरात नासुप्रच्या जागेवर ५२ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील विविध आरक्षण वगळून उर्वरित भागात पट्टे वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै २०१८ पर्यंत निवडलेल्या वस्त्यात सर्वे करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. यातील ३० वस्त्यातील काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. १५ आॅगस्टपर्यंत पट्टेवाटप करण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या दीड वर्षात नागपूर शहरात ६८३ झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यात आले आहे.  नागपूर शहरात झोपडपट्टीधारकांची नऊ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. यातील लाखाहून अधिक झोडपट्टीधारकांकडे मालकीहक्काचे पट्टे नाहीत. महापालिकेच्या  जागांवर १५ झोपडपट्ट्या असून ८ ठिकाणी ही प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. पण पट्टेवाटप सुरू करण्यात आलेले नाही.  काही झोपडपट्ट्या नासुप्र, महापालिका व नझूल विभागाच्या संयुक्त मालकीच्या जागेवर आहेत. अशा झोपडपट्टीत पट्टे वाटप होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानHomeघर