शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मला ईडीत अडकवण्याचा प्रयत्न तर सामान्यांची काय कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:50 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ईडीच्या चौकशीत माझ्यासारख्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे सामान्यजनांची काय अवस्था होऊ शकते हे तुम्ही समजून घ्या. शेतीच्या अवजारांच्या किंमती वाढल्या, खतांमध्ये भाववाढ झाली आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.पुलवामातील लष्करी तळ उध्वस्त करण्याचा निर्णय एकट्या मोदींचा नव्हता, त्यात आम्ही सहभागी होतो. माजी संरक्षणमंत्री या नात्याने मीही त्या बैठकीत हजर होतो, मात्र त्याचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतल्याचे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानसोबत युद्ध करून बांगलादेशची निर्मिती केली. मात्र आम्ही त्याचा राजकीय फायदा कधीच घेतला नाही. भाजपाने मात्र अशा कारवायांचा फायदा उचलला. त्या बळावरच त्यांनी लोकसभेच्या न्विडणुका जिंकल्या असे ते पुढे म्हणाले.आपण कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही भेटी दिल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात एक हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती.या या सरकारने कोणते हिताचे निर्णय घेतले ते सांगावे. हे सरकार सर्वसामान्यांना संकटात लुटणारे आहे. महागाई वाढली, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, निवड सत्तेचा गैरवापर करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.पी चिदंबरम यांचा काय गुन्हा होता हे सांगावे दीड महिन्यापासून त्यांना कारागृहात डांबले आहे. कुठल्याही कर्जवाटपात माझा कसलाही संबंध नसताना माझ्यावर नोटीस बजावली. मी स्वत: त्यांच्याकडे पाहुणचाराला घेण्याची तयारी दाखवल्यावर मात्र ते घाबरले. येऊ नका अशी विनंती केली. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन मी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केलाशिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार बांधणार होते भूमिपूजन झाले पण त्यापुढे काम सरकलं नाही. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा झाली त्याला कसलाही पत्ता नाही. राजकीय फायद्यासाठी खोट्या घोषणा देण्याचे काम सरकार करीत आहे असे शरद पवार पुढे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार