शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

स्वामीनाथन आयोगाची गरजच काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:46 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे असताना स्वामीनाथन आयोग लागू केल्यास फक्त दीडपटच भाव मिळेल.

ठळक मुद्दे- तर सरकारच्या प्रयत्नाने मिळेल दुप्पट भाव : पाशा पटेल यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे असताना स्वामीनाथन आयोग लागू केल्यास फक्त दीडपटच भाव मिळेल. दीडपटपेक्षा दोनपट नक्कीच जास्त असल्याने शेतकºयांच्या फायद्याचे काय राहील, असा प्रतिसवाल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेत केला.देशात स्वामीनाथन आयोग कधी लागू होणार, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी सरकार शेतकºयांसाठी करीत असलेल्या विविध धोरणांची माहिती दिली. केंद्र शासनाने कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशींची गंभीरतेने दखल घेतली आहे. त्या माध्यमातून कृषिमालाच्या आयात-निर्यातीवर नियंत्रणाबाबत महत्त्वाचे ठराव घेण्यात आले आहेत. सध्या कृषिमालाचे भाव कमी असले तरी भविष्यात या निर्णयामुळे शेतकºयांच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळेल, असा विश्वासही पाशा पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.सरकारने दोन लाख टनाच्यावर तूर डाळ व तीन लाख टनाच्यावर उडद डाळीच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला; शिवाय तूर डाळीवरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात विदेशातून होत असून, मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर जातो. त्यामुळे रिफार्इंड तेलावर ४५ टक्के आणि क्रूड तेलावर ३५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव मिळेल. सोयाबीन, सूर्यफुलाच्या आयातीवरही शुल्क लावण्यात आले. शेतकºयांचा मालही निर्यात होत आहे. त्यास शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.सध्या शेतमालाचे हमीभाव कमी असले तरी भविष्यात या धोरणाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सोयाबीनवर मॉईश्चरचे प्रमाण अधिक असल्याने व्यापारी अधिक भाव देण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले.शेतकºयांनो सोयाबीन विकू नकासोयाबीनला येत्या काळात चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.कापूस, सोयाबीनला बोनस द्याकापसाला ५०० रुपये बोनस देण्यासोबतच धान आणि सोयाबीनला बोनस देण्याची मागणी आमदार आशिष देशमुख यांनी यावेळी केली.