शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपूरला राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ देण्यावर काय भूमिका आहे? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 19:59 IST

Nagpur News राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे स्थायी किंवा फिरते खंडपीठ देण्याच्या मागणीवर केंद्र सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली.

 

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे स्थायी किंवा फिरते खंडपीठ देण्याच्या मागणीवर केंद्र सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली व यावर येत्या चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात सिटीझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे व ग्राहक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष ॲड. अनुराधा देशपांडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील १७ शहरांमध्ये फिरते खंडपीठ कार्यरत करण्याची विनंती केली आहे. संबंधित शहरांत राज्यातील नागपूर, पुणे व मुंबईचा समावेश आहे. याशिवाय नागपूरमध्ये स्थायी खंडपीठ स्थापन करण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, केंद्र सरकारने यावर अद्याप ठोस निर्णय घेतला नाही, अशी माहिती सुनावणी दरम्यान न्यायालयाला देण्यात आली. करिता, न्यायालयाने केंद्र सरकारला यावर उत्तर मागितले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर व ॲड. रोहण मालविया यांनी कामकाज पाहिले.

सध्या दिल्लीला जावे लागते

सध्या वकील व पक्षकारांना राष्ट्रीय ग्राहक आयोगातील प्रकरणांसाठी दिल्लीला जावे लागते. त्यात त्यांचा भरपूर पैसा, ऊर्जा व वेळ खर्च होतो. दारात न्याय देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता नागपूरला आयोगाचे खंडपीठ देणे आवश्यक आहे. देशात राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाचे १७ व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे २१ खंडपीठे आहेत, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय