ही तर आर्थिक कोंडी : काहींनी केले निर्णयाचे स्वागतनागपूर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारतर्फे दररोज नवनवे निर्णय घेतले जात आहेत. बँकेसमोर वारंवार रांगेत लागून पैसे बदलणाऱ्या ग्राहकांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निवडणुकीत मतदान करणाऱ्यांसारखी बोटावर शाई लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आधीच प्रचंड कामात गुंतलेल्या बँक कर्मचाऱ्यांना शाई लावण्याचे नवीन काम करावे लागत आहे. शाई लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. लोकमत प्रतिनिधीने नागपुरातील विविध बँकेत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सरकार देशाच्या नागरिकांवर अविश्वास दाखवत असून यामुळे आर्थिक कोंडी निर्माण होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. काहींनी या निर्णयाचे स्वागतही केले. (प्रतिनिधी)
कशासाठी लावली जातेय शाई?
By admin | Updated: November 19, 2016 03:10 IST