शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठात चालले तरी काय?

By admin | Updated: November 6, 2014 02:45 IST

शिक्षणाची ज्ञानगंगा समाजात जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

नागपूर : शिक्षणाची ज्ञानगंगा समाजात जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी लाखो विद्यार्थी येथून पदव्या मिळवून प्रगतिपथाकडे वाटचाल करतात. परंतु डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला बहुतेक या पदव्यांचे वावडे आहे. म्हणूनच येथून पदव्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांना समकक्ष मानण्यास विद्यापीठाने नकार देत त्यांना पदोन्नती नाकारली आहे. अगदी कृषी परिषदेने मुक्त विद्यापीठ पदवीप्राप्त कृषी सहायकांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविण्यासंदर्भात पारीत केलेल्या ठरावाला तसेच सूचनांनादेखील विद्यापीठाने विचारात घेतलेले नाही. महाराष्ट्रातच मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना किंमत नाही की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. १४३ पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी १७ जुलै २०१४ रोजी काढण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मुक्त विद्यापीठातून पदवी मिळविलेले कर्मचारी पदोन्नतीस पात्र नसल्याचे नमूद करण्यात आले होते. दुसरीकडे कृषी परिषदेने ८४ व्या सभेमध्ये मुक्त विद्यापीठ पदवीप्राप्त कृषी सहायकांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविण्यासाठी शासनाच्या शिफारशीस्तव ठराव पारित केला होता. कृषी परिषदेच्या सूचनांना विद्यापीठाने तिलांजलीच दिली आहे. कृषी विद्यापीठाच्याच कार्यकारी परिषदेने ८ जून २०१२ च्या ठरावानुसार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ‘बीएस्सी (कृषी) तसेच बीएस्सी (फलोत्पादन) या पदवी घेतलेल्या कृषी सहायकांना वरिष्ठ संशोधन सहायक पदापर्यंत पदोन्तीसाठी पात्र ठरविण्यास मान्यता दिली होती. तरीदेखील संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास कृषी विद्यापीठाने थेट नकार दिला आहे. यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांशी संपर्क होऊ शकला नाही. ११ जून २०१३ रोजी या मुद्यावर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ पर्रिनियम व १० डिसेंबर १९९८ रोजीच्या शासन निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीस पात्र ठरविण्यासाठी शासनानेच मान्यता द्यावी, अशी विनंती याद्वारे करण्यात आली होती अशी माहिती विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. परंतु विद्यापीठ व शासनाच्या लेटलतिफीत आमची संधी हिरावणे हा कुठला न्याय आहे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.काय आहे प्रकरण?यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कृषी विषयात बी.एस्सी. झालेल्या १६ उमेदवारांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी सहायक म्हणून मुलाखती घेऊन नियुक्ती दिली. यातील काही कर्मचारी १९८० पासून कार्यरत आहेत. यांच्या कामाच्या बाबतीत विद्यापीठांमध्ये कोणतीही तक्रार नसून त्यांचे गोपनीय अहवालसुद्धा चांगले आहेत. परंतु जेव्हा कनिष्ठ संशोधन सहायक/ वरिष्ठ संशोधन सहायक म्हणून बढतीसाठी त्यांची नावे आलीत तेव्हा त्यांना संधी नाकारण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या नऊ कृषी सहायकांना पदोन्नती देण्यात आली. एकीकडे शासनाच्या कृषी खात्यामध्ये मुक्त विद्यापीठ कृषीपदवी प्राप्त कृषी सहायकांना पदोन्नती मिळत असताना कृषी विद्यापीठाने मात्र महाराष्ट्र कृषी विद्यापीठ पर्रिनियम व शासन निर्णयाचा आधार घेत यास नकार दिला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)