शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘हेल्मेट’ न घालणाऱ्यांचे काय?

By admin | Updated: November 29, 2014 02:57 IST

संपूर्ण राज्यात मोटरसायकलस्वारांना ‘हेल्मेट’सक्ती असताना शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येते.

नागपूर : संपूर्ण राज्यात मोटरसायकलस्वारांना ‘हेल्मेट’सक्ती असताना शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येते. ‘हेल्मेट’ न घालणाऱ्यांविरुद्ध वाहतूक विभागाकडून ठोस कारवाई होत नाही. माहितीच्या अधिकारातूनच ही बाब समोर आली आहे. या वर्षी जवळपास ११ महिन्यांत केवळ ५४८ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ३० टक्के वाहनचालक हे पोलीस कर्मचारीच होते. जर शहरातील पोलीसच कायदा पाळत नसतील तर जनतेवर वचक कसा राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरात ‘हेल्मेट’सक्ती आहे का, किती वाहनचालकांवर कारवाई झाली, सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या व त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला दंड यासंदर्भात विचारणा केली होती. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन ‘हेल्मेट’ न वापरणाऱ्यांवर हवी तशी कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. या वर्षी १ जानेवारी ते २५ आॅक्टोबर या कालावधीत ५४८ दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांच्याकडून ५४ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. कारवाई झालेल्यांमध्ये १६६ म्हणजेच सुमारे ३० टक्के दुचाकीस्वार हे पोलीस कर्मचारीच होते. त्यांच्याकडून दंडापोटी १६ हजार ७०० रुपये वसूल करण्यात आले. २०११ साली ७६९. २०१२ साली ६७३ आणि २०१३ साली ६६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती. (प्रतिनिधी)