शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

यालाच हिंदू धर्म म्हणायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:19 IST

सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते. माणसं मारली जातात त्याकडे कुणाचे लक्ष नाही. मात्र एखाद्या दगडावरचा शेंदूरही निघाला तरी हजारो मारायला निघतात, यालाच हिंदू धर्म म्हणायचा का? अशी दुर्देवी स्थिती देशात निर्माण झाली आहे. तेव्हा आपण हिंदू राज्याकडे जातोय की नाझी राज्याकडे ? असा सवाल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देचर्चासत्र : सुरेश द्वादशीवार यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते. माणसं मारली जातात त्याकडे कुणाचे लक्ष नाही. मात्र एखाद्या दगडावरचा शेंदूरही निघाला तरी हजारो मारायला निघतात, यालाच हिंदू धर्म म्हणायचा का? अशी दुर्देवी स्थिती देशात निर्माण झाली आहे. तेव्हा आपण हिंदू राज्याकडे जातोय की नाझी राज्याकडे ? असा सवाल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केला.ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चासत्र शनिवारी धनवटे सभागृह शंकरनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अ.भा. बौद्धिक प्रमुख मा.गो. वैद्य, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ प्रमुख अतिथी होते.देशात २६ कोटी अल्पसंख्याक राहतात. यांच काय करणार ? हिंदू राष्ट्राच्या पुरस्कर्त्यांकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. धर्मनिरपेक्ष हे केवळ मूल्य नसून ते आपले धोरण आहे, असेही द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.यावेळी मा.गो. वैद्य म्हणाले ‘ हिंदू राष्ट्र स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्र म्हणजे लोकसत्ता होय. आपल्या भूमीवर प्रेम असणे, त्याचा एक इतिहास आणि एक जीवनमूल्य या तीन अटी राष्ट्रासाठी लागतात.रिलीजन हा धर्माचा एक भाग आहे. पूर्ण धर्म नव्हे. धर्म एक व्यापक संकल्पना आहे. संपूर्ण मानवाशी जोडणारा तो मानवधर्म होय.रवींद्र रुक्मिनी पंढरीनाथ यांनी ‘आरएसएसला कोणता हिंदू धर्म हवा आहे? दाभोळकरांचा की गोडसेचा? असा प्रश्न उपस्थित केला.पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, वैचारिक वाद नवीन नाहीत. ते चालत राहतील. पण एकसंघ हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही. झालेच तर २५-३० वेगवेगळे राष्ट्र होतील.प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले. संचालन अतुल विडुळकर यांनी केले. अरुणा सबाने यांनी आभार मानले.

टॅग्स :Hinduहिंदूcultureसांस्कृतिक