शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

यालाच हिंदू धर्म म्हणायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:19 IST

सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते. माणसं मारली जातात त्याकडे कुणाचे लक्ष नाही. मात्र एखाद्या दगडावरचा शेंदूरही निघाला तरी हजारो मारायला निघतात, यालाच हिंदू धर्म म्हणायचा का? अशी दुर्देवी स्थिती देशात निर्माण झाली आहे. तेव्हा आपण हिंदू राज्याकडे जातोय की नाझी राज्याकडे ? असा सवाल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देचर्चासत्र : सुरेश द्वादशीवार यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते. माणसं मारली जातात त्याकडे कुणाचे लक्ष नाही. मात्र एखाद्या दगडावरचा शेंदूरही निघाला तरी हजारो मारायला निघतात, यालाच हिंदू धर्म म्हणायचा का? अशी दुर्देवी स्थिती देशात निर्माण झाली आहे. तेव्हा आपण हिंदू राज्याकडे जातोय की नाझी राज्याकडे ? असा सवाल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केला.ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चासत्र शनिवारी धनवटे सभागृह शंकरनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अ.भा. बौद्धिक प्रमुख मा.गो. वैद्य, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ प्रमुख अतिथी होते.देशात २६ कोटी अल्पसंख्याक राहतात. यांच काय करणार ? हिंदू राष्ट्राच्या पुरस्कर्त्यांकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. धर्मनिरपेक्ष हे केवळ मूल्य नसून ते आपले धोरण आहे, असेही द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.यावेळी मा.गो. वैद्य म्हणाले ‘ हिंदू राष्ट्र स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्र म्हणजे लोकसत्ता होय. आपल्या भूमीवर प्रेम असणे, त्याचा एक इतिहास आणि एक जीवनमूल्य या तीन अटी राष्ट्रासाठी लागतात.रिलीजन हा धर्माचा एक भाग आहे. पूर्ण धर्म नव्हे. धर्म एक व्यापक संकल्पना आहे. संपूर्ण मानवाशी जोडणारा तो मानवधर्म होय.रवींद्र रुक्मिनी पंढरीनाथ यांनी ‘आरएसएसला कोणता हिंदू धर्म हवा आहे? दाभोळकरांचा की गोडसेचा? असा प्रश्न उपस्थित केला.पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, वैचारिक वाद नवीन नाहीत. ते चालत राहतील. पण एकसंघ हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही. झालेच तर २५-३० वेगवेगळे राष्ट्र होतील.प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले. संचालन अतुल विडुळकर यांनी केले. अरुणा सबाने यांनी आभार मानले.

टॅग्स :Hinduहिंदूcultureसांस्कृतिक