शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘फेक न्यूज’च्या गुन्ह्यांचे ‘रिअल’ आकडे कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:48 IST

Fake News Nagpur News नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे.

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात ‘सोशल मीडिया’वर ‘फेक न्यूज’चे प्रमाण वाढलेले दिसून येते. मात्र प्रशासकीय नोंदींमध्ये अद्यापही हे प्रमाण नगण्यच आहे. नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे नेमके कुणाचे आकडे खरे व कुणाकडून ‘फेक’ माहिती देण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांच्या नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो व असे करणाऱ्यांविरोधात कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

नागपूर पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल झाले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये तीन गुन्हे दाखल झाले. परंतु ‘एनसीआरबी’च्या २०१७, २०१८ व २०१९ सालच्या अहवालात मात्र या गुन्ह्यांचा आकडा शून्य दाखविण्यात आला आहे. अशा स्थितीत माहितीचा अधिकार खरा की ‘एनसीआरबी’ची माहिती, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारवाईचे प्रमाण कधी वाढणार?राज्यभरात ‘फेक न्यूज’ दिसून येत असल्या तरी यासंदर्भात कारवाईचे प्रमाण फारच कमी आहे. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत राज्यात केवळ २० गुन्हे दाखल झाले. ‘फेक न्यूज’विरोधात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज