शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

तुली पिता-पुत्रासोबत कोणत्या अधिकारात केला समझोता ?

By admin | Updated: June 17, 2015 03:02 IST

वन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायी मोहब्बतसिंग तुली आणि त्यांचे चिरंजीव सत्यवीत विक्रमसिंग तुली

नागपूर : वन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायी मोहब्बतसिंग तुली आणि त्यांचे चिरंजीव सत्यवीत विक्रमसिंग तुली यांच्यासोबत कोणत्या अधिकारात समझोता केला , अशी विचारणा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांना करून १९ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान समझोता होऊन वन विभागाकडे तडजोड शुल्काचा भरणा करण्यात आल्याने या दोन्ही आरोपी पिता-पुत्राने आपापले अटकपूर्व जामिनाचे अर्ज मागे घेतले. प्रकरण असे होते की, देवलापार क्षेत्रातील मानसिंग अभयारण्याला लागून बांद्रा या गावात तुली वीर बाघ रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टचे प्रबंध संचालक मोहब्बतसिंग तुली आणि संचालक सत्यवीत विक्रमसिंग हे आहेत. या रिसॉर्टच्या मागे वन विभागाच्या जागेवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या, जळालेले प्लास्टिक आदी आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून १२ जानेवारी २०१५ रोजी तुली पिता-पुत्राविरुद्ध भारतीय वन कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. अटकेच्या भीतीने सत्यवीत विक्रमसिंग याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा दिला होता. मोहब्बतसिंग तुली हे परदेशात असल्याने त्यांचे प्रकरण जैसे थे होते. दरम्यान अर्ज न्यायालयात असताना तुली पिता-पुत्राने मुख्य वन संरक्षक रेड्डी यांची भेट घेऊन तडजोड होण्याबाबत अर्ज दाखल केला होता. आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून चूक झाली, असेही त्यांनी समझोता पत्रात नमूद केले होते. रेड्डी यांनी वन्य जीव कायद्यान्वये तडजोड करून नुकसान भरपाईची १५ हजाराची रक्कम अदा करण्यास त्यांना सांगितले होते. ९ जून रोजी अटकपूर्व जामिनाच्या सुनावणी दरम्यान परिक्षेत्र वन अधिकाऱ्याने समझोतापत्र न्यायालयात दाखल केले होते. लागलीच न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दाखल घेऊन भारतीय वन कायद्याच्या कोणत्या अधिकारात समझोता करण्यात आला, अशी विचारणा करणारी नोटीस रेड्डी यांना जारी केली होती. आज मंगळवारी रेड्डी न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी कोणत्या प्रकारे समझोता केला याबाबत माहिती दिली. न्यायालयाने त्यांना १९ पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. न्यायालयात जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी सरकारची बाजू मांडली. (प्रतिनिधी)