शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या-सुक्या कचऱ्यामुळे तीन दिवसाआड कचरागाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : सुंदर व स्वच्छ शहराच्या वल्गना केल्या जात असताना, घराघरांतून कचरा उचलण्याची मोहीम ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे फसल्याचे ...

नागपूर : सुंदर व स्वच्छ शहराच्या वल्गना केल्या जात असताना, घराघरांतून कचरा उचलण्याची मोहीम ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे फसल्याचे दिसून येत आहे. नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करीत नाहीत. यामुळे कचरागाडीवरील कर्मचाऱ्यांवरच लोकांचा कचरा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यात वेळ जात असल्याने दुसऱ्या वसाहतींमध्ये दोन-तीन दिवसाआड कचऱ्याची गाडी येत आहे. नाइलाजाने लोकांना रस्त्यावर, मोकळ्या जागी कचरा फेकावा लागत आहे.

घराघरांतून कचरा गोळा करण्याचे कंत्राट दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. झोन क्र. १ ते ५ या वसाहतींमधील कचऱ्याची जबाबदारी ‘एजी एन्व्हायरो प्रा. लि. कंपनी’ला देण्यात आली. नोव्हेंबर २०१९ पासून ही कंपनी कार्यरत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने सुरुवातीला ओला-सुका कचरा वेगळ्या करण्यावर मोठी जनजागृती केली. परंतु कोरोनाच्या काळात याकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे पुन्हा एकत्र कचरा टाकणे सुरू झाले. आता महापालिकेने यावर आक्षेप घेतला आहे. नागरिक ओला-सुका कचरा वेगळा करून देत नाहीत. यामुळे कंपनीने आपल्या सर्व कचरा गाडीचालकांना लोकांचा कचरा वेगळा करण्याची सक्ती केली. यात बराच वेळ जातो. सकाळी ६.३० वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंतच्या कामाच्या वेळात एकाच वसाहतीतील कचरा उचलणेही शक्य होत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांच्या वर वेळ जात असल्याने संबंधित गाडीवर अवलंबून असलेल्या दुसऱ्या वसाहतींमध्ये गाडी जाण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे.

कुकडे लेआऊटमध्ये तीन दिवसांनंतर कचरागाडी

कुकडे लेआऊट येथील संजय राऊत यांनी सांगितले, नियमित असलेली कचरागाडी मागील आठवड्यापासून अचानक अनियमित झाली. रविवारी तब्बल तीन दिवसांनंतर कचरागाडी आली. गाडीतील कर्मचाऱ्यांवर कचऱ्याचा डबा दिल्यावर तो स्वत: ओला आणि सुका कचरा वेगळा करीत असल्याने वेळ लागत होता. कचरा टाकण्यासाठी लाईन लागली होती.

- नवीन बाभूळखेड्यात तीन दिवसांपासून कचरागाडीची प्रतीक्षा

नवीन बाभूळखेड्यातील क्रिस्टिना जेम्स यांनी सांगितले की, कचरागाडीची वेळ सकाळी ६.३० वाजताची आहे. झोपमोड करून गाडीची वाट पाहावी लागते. मागील तीन दिवसांपासून गाडीच आली नाही. घरात कचरा तुंबून दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नाइलाजाने बाहेर कचरा फेकण्याची वेळ आली.

लोकांनी ओला-सुका कचरा वेगळा करावा

घरातूनच ओला-सुका वेगळा करण्याचे मागील कित्येक महिन्यांपासून आवाहन केले जात आहे. परंतु अनेक नागरिक हे गंभीरतेने घेत नाहीत. नकार दिल्यास हे लोक रस्त्यावर कचरा टाकतात. यामुळे आमचा कर्मचारी कचऱ्याचे वर्गीकरण करतो. यात वेळ जात आहे; परंतु लवकरच ही समस्या निकाली निघेल.

-विशाल जनबंधू

धंतोली झोनप्रमुख, एजी एन्व्हायरो प्रा. लि. कंपनी