शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

- हा तर गुंतवणूकदारांना फसविण्याचा सुनियोजित कट

By admin | Updated: December 23, 2015 03:42 IST

वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने एका सुनियोजित कटांतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केली,

हायकोर्टाचा निष्कर्ष : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा घोटाळानागपूर : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने एका सुनियोजित कटांतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भाग्यश्री वासनकर, विनय वासनकर व अभिजित चौधरीचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविला आहे. शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार कंपनीने गुंतवणूकदारांची १५९ कोटींवर रुपयांनी फसवणूक केली आहे. आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास आकर्षित केले. ही सुनियोजित कटाची सुरुवात होती. नागरिक या जाळ्यात फसले. आरोपींनी ३० ते ६० टक्के परताव्याचे वचन देऊन नागरिकांकडून पैसे गोळा केले. हा परतावा प्रचलित दरापेक्षा अधिक आहे. यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना फसविण्यासाठीच हा कट रचला होता, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा वाव असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पोलीस कारवाईचा संशय आल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून सर्व रक्कम दुसरीकडे वळती केली. यानंतर पोलिसांना कंपनीच्या खात्यांमध्ये ३७८, ३४३, १३८९, ३१३८, २४,००० अशी किरकोळ रक्कम आढळून आली. या सर्व खात्यांमध्ये सुरुवातीला मोठी रक्कम होती. मार्च व जून महिन्यात ५१ कोटी ५८ लाख ५ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीकडे स्थानांतरित करण्यात आले. अर्जदारांना जामिनावर सोडल्यास ते या रकमेपर्यंत पोहोचतील व अशावेळी थेट गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होईल. यामुळे अर्जदारांना जामीन दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ‘निम्मगड्डा प्रसाद वि. सीबीआय’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ या आदेशात देण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयांनी आरोपाचे स्वरूप, आरोपाच्या समर्थनासाठी सादर पुराव्यांचे स्वरूप, गुन्ह्यातील शिक्षेची तीव्रता, आरोपींचे व्यक्तिमत्त्व, आरोपींच्या विरोधातील परिस्थिती, खटल्यावरील सुनावणीदरम्यान आरोपी उपस्थित राहील याची शक्यता, साक्षीदार प्रभावित होण्याचा धोका, जनहित व इतरही काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. या टप्प्यावर शासनाने आरोपीविरुद्ध संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करणे अपेक्षित नसते. परंतु गुन्ह्याबाबत प्राथमिक पुरावे सादर करणे आवश्यक आहे. आर्थिक गुन्ह्याच्या बाबतीतही वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. विचारपूर्वक कट रचून केलेल्या आणि सार्वजनिक निधीचे प्रचंड मोठे नुकसान करणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे. देशाची अर्थव्यवस्था प्रभावित करणारे गुन्हे म्हणून याचा विचार करायला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित निर्णयात म्हटले आहे.