शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

- हा तर गुंतवणूकदारांना फसविण्याचा सुनियोजित कट

By admin | Updated: December 23, 2015 03:42 IST

वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने एका सुनियोजित कटांतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केली,

हायकोर्टाचा निष्कर्ष : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा घोटाळानागपूर : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने एका सुनियोजित कटांतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भाग्यश्री वासनकर, विनय वासनकर व अभिजित चौधरीचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविला आहे. शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार कंपनीने गुंतवणूकदारांची १५९ कोटींवर रुपयांनी फसवणूक केली आहे. आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास आकर्षित केले. ही सुनियोजित कटाची सुरुवात होती. नागरिक या जाळ्यात फसले. आरोपींनी ३० ते ६० टक्के परताव्याचे वचन देऊन नागरिकांकडून पैसे गोळा केले. हा परतावा प्रचलित दरापेक्षा अधिक आहे. यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना फसविण्यासाठीच हा कट रचला होता, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा वाव असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पोलीस कारवाईचा संशय आल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून सर्व रक्कम दुसरीकडे वळती केली. यानंतर पोलिसांना कंपनीच्या खात्यांमध्ये ३७८, ३४३, १३८९, ३१३८, २४,००० अशी किरकोळ रक्कम आढळून आली. या सर्व खात्यांमध्ये सुरुवातीला मोठी रक्कम होती. मार्च व जून महिन्यात ५१ कोटी ५८ लाख ५ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीकडे स्थानांतरित करण्यात आले. अर्जदारांना जामिनावर सोडल्यास ते या रकमेपर्यंत पोहोचतील व अशावेळी थेट गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होईल. यामुळे अर्जदारांना जामीन दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ‘निम्मगड्डा प्रसाद वि. सीबीआय’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ या आदेशात देण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयांनी आरोपाचे स्वरूप, आरोपाच्या समर्थनासाठी सादर पुराव्यांचे स्वरूप, गुन्ह्यातील शिक्षेची तीव्रता, आरोपींचे व्यक्तिमत्त्व, आरोपींच्या विरोधातील परिस्थिती, खटल्यावरील सुनावणीदरम्यान आरोपी उपस्थित राहील याची शक्यता, साक्षीदार प्रभावित होण्याचा धोका, जनहित व इतरही काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. या टप्प्यावर शासनाने आरोपीविरुद्ध संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करणे अपेक्षित नसते. परंतु गुन्ह्याबाबत प्राथमिक पुरावे सादर करणे आवश्यक आहे. आर्थिक गुन्ह्याच्या बाबतीतही वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. विचारपूर्वक कट रचून केलेल्या आणि सार्वजनिक निधीचे प्रचंड मोठे नुकसान करणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे. देशाची अर्थव्यवस्था प्रभावित करणारे गुन्हे म्हणून याचा विचार करायला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित निर्णयात म्हटले आहे.