शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

सैन्याप्रमाणे देशहित समोर ठेवा : राजेश कुंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:24 IST

भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.

ठळक मुद्देभोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.भोसला मिलिटरी स्कूलच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कारगिल विजय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव कुमार काळे, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल जे. एस. भंडारी, अजय शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर जनरल राजेश कुंद्रा म्हणाले, चारित्र्यावर आर्मीत भर देण्यात येतो. विश्वासाची शक्ती, चेतनेची शक्ती, भीतीची शक्ती आणि ऊर्जेची शक्ती या चार बाबींमुळे आर्मी इतरांपेक्षा वेगळी ठरते. आर्मीतील जवान जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम करतात. नाम, नमक आणि निशाणसाठी ते प्राणपणाने लढत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नल जे. एस. भंडारी यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन येथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्यामुळे ही मध्य भारतातील सर्वात मोठी मिलिटरी स्कूल ठरल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव कुमार काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कारगिलच्या लढाईत विजय मिळवून देणाºया शूर जवानांना आदरांजली अर्पण केली. आभार शैलेश जोगळेकर यांनी मानले. यावेळी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांना कुमार काळे यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. समारंभापूर्वी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी अमर जवान स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. रामनगर येथून पथसंचलन करण्यात आले. लक्ष्मीभुवन आणि रविनगर या दोन मार्गाने निघालेले भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी लॉ कॉलेज चौकात एकत्र आले. तेथून ते वसंतराव देशपांडे सभागृहात पोहोचले.