शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सैन्याप्रमाणे देशहित समोर ठेवा : राजेश कुंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:24 IST

भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.

ठळक मुद्देभोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.भोसला मिलिटरी स्कूलच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कारगिल विजय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव कुमार काळे, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल जे. एस. भंडारी, अजय शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर जनरल राजेश कुंद्रा म्हणाले, चारित्र्यावर आर्मीत भर देण्यात येतो. विश्वासाची शक्ती, चेतनेची शक्ती, भीतीची शक्ती आणि ऊर्जेची शक्ती या चार बाबींमुळे आर्मी इतरांपेक्षा वेगळी ठरते. आर्मीतील जवान जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम करतात. नाम, नमक आणि निशाणसाठी ते प्राणपणाने लढत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नल जे. एस. भंडारी यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन येथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्यामुळे ही मध्य भारतातील सर्वात मोठी मिलिटरी स्कूल ठरल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव कुमार काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कारगिलच्या लढाईत विजय मिळवून देणाºया शूर जवानांना आदरांजली अर्पण केली. आभार शैलेश जोगळेकर यांनी मानले. यावेळी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांना कुमार काळे यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. समारंभापूर्वी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी अमर जवान स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. रामनगर येथून पथसंचलन करण्यात आले. लक्ष्मीभुवन आणि रविनगर या दोन मार्गाने निघालेले भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी लॉ कॉलेज चौकात एकत्र आले. तेथून ते वसंतराव देशपांडे सभागृहात पोहोचले.