शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सैन्याप्रमाणे देशहित समोर ठेवा : राजेश कुंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:24 IST

भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.

ठळक मुद्देभोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.भोसला मिलिटरी स्कूलच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कारगिल विजय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव कुमार काळे, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल जे. एस. भंडारी, अजय शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर जनरल राजेश कुंद्रा म्हणाले, चारित्र्यावर आर्मीत भर देण्यात येतो. विश्वासाची शक्ती, चेतनेची शक्ती, भीतीची शक्ती आणि ऊर्जेची शक्ती या चार बाबींमुळे आर्मी इतरांपेक्षा वेगळी ठरते. आर्मीतील जवान जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम करतात. नाम, नमक आणि निशाणसाठी ते प्राणपणाने लढत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नल जे. एस. भंडारी यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन येथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्यामुळे ही मध्य भारतातील सर्वात मोठी मिलिटरी स्कूल ठरल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव कुमार काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कारगिलच्या लढाईत विजय मिळवून देणाºया शूर जवानांना आदरांजली अर्पण केली. आभार शैलेश जोगळेकर यांनी मानले. यावेळी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांना कुमार काळे यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. समारंभापूर्वी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी अमर जवान स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. रामनगर येथून पथसंचलन करण्यात आले. लक्ष्मीभुवन आणि रविनगर या दोन मार्गाने निघालेले भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी लॉ कॉलेज चौकात एकत्र आले. तेथून ते वसंतराव देशपांडे सभागृहात पोहोचले.