शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

चांगली जडणघडण होईल तेथेच मुलाचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:07 IST

नागपूर : आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच ...

नागपूर : आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, त्या मुलाचा ताबा दत्तक घेणाऱ्या पालकांकडेच कायम ठेवण्यात आला.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व ॲड. नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. दोन कुटुंबातील वादामुळे लग्न होऊनही एकत्र राहू न शकलेल्या अनवर व हसीना (बदललेली नावे) या दाम्पत्याने ३० ऑगस्ट २०१४ रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर हसीना मुलाला घेऊन माहेरी गेली. मुलाला कावीळ झाला होता. त्याची प्रकृती खालावली होती. हसीनाच्या पालकांकडे त्या मुलावर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी पैसे नव्हते तसेच, हसीनाची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे त्या मुलाला तो पाच दिवसाचा असताना सधन व सुसंस्कृत अन्सारी दाम्पत्याने दत्तक घेतले. त्या मुलावर अडीच लाख रुपये खर्च करून चांगल्या रुग्णालयात उपचार केले. तो मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. दरम्यान, अनवर व हसीनाने दत्तक करार अवैध असल्याचा दावा करून, त्या मुलाचा ताबा मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुलाचे सर्वांगीण हित लक्षात घेता ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही विविध बाबी लक्षात घेता, कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील खारीज केले. अन्सारी दाम्पत्याच्या वतीने ॲड. मसुद शरीफ व ॲड. आदिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

---------------

-तर मुलावर मानसिक आघात

मुलाची जडणघडण अत्यंत चांगल्या वातावरणात होत आहे. मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. त्याने अन्सारी दाम्पत्याला स्वत:चे माता-पिता मानले आहे. त्याचे मानसिक व भावनिक धागे अन्सारी दाम्पत्यासोबत घट्ट बांधले गेले आहेत. अन्सारी दाम्पत्य मुलाला सर्व बाबतीत सर्वोत्तम जीवन प्रदान करण्यास सक्षम आहेत. मुलाचे त्यांच्यासोबत राहण्यातच कल्याण आहे. जन्मदात्याकडे ताबा दिल्यास मुलावर प्रचंड मानसिक आघात होईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले. अनवरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याचे घर टिनाचे आहे. त्याला दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या दोन मुली शाळेत जात नाहीत. हसीनावर मानसिक उपचार सुरू आहेत. अन्सारी दाम्पत्याकडे मुलाचा ताबा कायम ठेवताना या बाबीही विचारात घेण्यात आल्या.