शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

चांगली जडणघडण होईल तेथेच मुलाचे कल्याण; हायकोर्टाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 07:00 IST

Nagpur news आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देजन्मदात्या पालकांना ताबा देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, त्या मुलाचा ताबा दत्तक घेणाऱ्या पालकांकडेच कायम ठेवण्यात आला.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व ॲड. नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. दोन कुटुंबातील वादामुळे लग्न होऊनही एकत्र राहू न शकलेल्या अनवर व हसीना (बदललेली नावे) या दाम्पत्याने ३० ऑगस्ट २०१४ रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर हसीना मुलाला घेऊन माहेरी गेली. मुलाला कावीळ झाला होता. त्याची प्रकृती खालावली होती. हसीनाच्या पालकांकडे त्या मुलावर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी पैसे नव्हते तसेच, हसीनाची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे त्या मुलाला तो पाच दिवसाचा असताना सधन व सुसंस्कृत अन्सारी दाम्पत्याने दत्तक घेतले. त्या मुलावर अडीच लाख रुपये खर्च करून चांगल्या रुग्णालयात उपचार केले. तो मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. दरम्यान, अनवर व हसीनाने दत्तक करार अवैध असल्याचा दावा करून, त्या मुलाचा ताबा मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुलाचे सर्वांगीण हित लक्षात घेता ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही विविध बाबी लक्षात घेता, कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील खारीज केले. अन्सारी दाम्पत्याच्या वतीने ॲड. मसुद शरीफ व ॲड. आदिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

-तर मुलावर मानसिक आघात

मुलाची जडणघडण अत्यंत चांगल्या वातावरणात होत आहे. मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. त्याने अन्सारी दाम्पत्याला स्वत:चे माता-पिता मानले आहे. त्याचे मानसिक व भावनिक धागे अन्सारी दाम्पत्यासोबत घट्ट बांधले गेले आहेत. अन्सारी दाम्पत्य मुलाला सर्व बाबतीत सर्वोत्तम जीवन प्रदान करण्यास सक्षम आहेत. मुलाचे त्यांच्यासोबत राहण्यातच कल्याण आहे. जन्मदात्याकडे ताबा दिल्यास मुलावर प्रचंड मानसिक आघात होईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले. अनवरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याचे घर टिनाचे आहे. त्याला दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या दोन मुली शाळेत जात नाहीत. हसीनावर मानसिक उपचार सुरू आहेत. अन्सारी दाम्पत्याकडे मुलाचा ताबा कायम ठेवताना या बाबीही विचारात घेण्यात आल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय