शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

विसर्जनासाठी विहीर व तलावाचे पाणी

By admin | Updated: September 22, 2015 03:50 IST

गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी आणून टाकले जात असल्याचे

नागपूर : गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी आणून टाकले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच जलकुंभावरून पाणी देणे बंद करण्यात आले. कृत्रिम तळ्यासाठी पर्यायी उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात यावा. ज्या ठिकाणी पर्याय नसेल तेथेच जलकुंभाच्या पाण्याचा वापर क रण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने सोमवारी दिले. शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्यासाठी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन तलावात करू नये. यासाठी कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात तसेच तलावाच्या किनाऱ्यावर ११८ ठिकाणी कृ त्रिम तळे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील अर्ध्याहून अधिक कृत्रिम टँक तयार झाले आहेत. फुटाळा तलाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, सोनेगाव तलाव आदी भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले. प्रशासनाने जलकुंभावरील पाणी देणे बंद केल्याने फुटाळा तलावाच्या काठावरील कृत्रिम टँकमध्ये तलावातील पाण्याचा वापर करण्यात आला. इतर तलावच्या ठिकाणी तसेच शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कृ त्रिम तळ्यासाठी विहीर वा तलावाच्या पाण्याचा वापर करण्यात आला. कृत्रिम तळ्यासाठी पर्यायी पाण्याचा वापर करण्यात आल्याने लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची बचत झाली आहे. तसेच टँकरवरील खर्चातही बचत झाली आहे. शहरातील काही भागातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. टँकरची प्रतीक्षा करावी लागते. दुसरीकडे कृत्रिम टँकसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. पिण्याच्या पाण्याचा वापर न करता जिथे-जिथे शक्य आहे तिथे पर्यायी पाण्याचा वापर क रण्याच्या सूचना केल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)शक्य तिथे पर्यायी पाण्याचा वापरसोनेगाव तलावातील पाणी कृत्रिम टँकसाठी वापरणे शक्य आहे. परंतु फुटाळा तलाव, गांधीसागर तलावातील पाणी वापरण्याजोगे नाही. दक्षिण नागपुरात कृत्रिम टँकसाठी विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. जिथे-जिथे जलकुंभातील पाण्याला पर्याय आहे. अशा ठिकाणी या पाण्याचा वापर केला जाणार आहे. पर्याय नसेल तेव्हाच जलकुंभाच्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना जलप्रदाय विभागाला केल्या आहे. प्रवीण दटके, महापौर, मनपा पर्याय नसेल तेथेच वापरकृत्रिम टँकसाठी पाण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. तलावातील पाणी घाण दिसते. ते वापरण्याजोगे नाही व दुसरा पर्याय नाही अशाच ठिकाणी जलकुंभातील पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी या पाण्याचा असा वापर केला जाणार आहे. तीन दिवसच याची गरज भासणार आहे. श्रावण हर्डीकर, आयुक्त, मनपा