शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

विदर्भाच्या उपेक्षेमुळेच विणकरांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:47 IST

विदर्भ ही कापूस उगवणारी भूमी असूनही या प्रांताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे : अन्सार नगरात जाहीर सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ ही कापूस उगवणारी भूमी असूनही या प्रांताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. परिणामी नागपुरातील विणकर बेरोजगार झाले, असा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केला. गुरुवारी मोमिनपुºयातील अन्सार नगर चौकात विदर्भ राज्य आघाडीतर्फे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी हाजी वकील परवेज तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. शरफुद्दीन साहिल, अ‍ॅड. खलिक अंजर, अनिल जवादे, बाबू हिफजुर्रहमान, कार्यक्रमाचे संयोजक फहीम अन्सारी, डॉ. रमजान अन्सारी, अकील अहमद उपस्थित होते. अणे पुढे म्हणाले, नागपूर परिसरात दर्जेदार कापसाचे उत्पन्न व्हायचे. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने कापसाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कोलकाता ते नागपूर अशी रेल्वे लाईन टाकली. त्याकाळात नागपुरातील विणकरांची स्थिती चांगली होती. परंतु पुढे विदर्भाचा महाराष्ट्रात विलय झाला आणि चित्र बदलत गेले. नागपूरला वगळून इचलकरंजीला कापड निर्मितीचे केंद्र बनविण्यात आले.परिणामी नागपुरातून हा व्यवसायच संपुष्टात आला. विदर्भाचा महाराष्ट्रात विलय करताना अनेक प्रस्तावांवर करार झाले होते. त्या करारातंर्गत विदर्भाच्या लोकसंख्येच्या आधारावर विकास निधी, नोकरीत वाटा देण्याचे ठरले होते. परंतु आज नागपूर आणि अमरावती मिळून फक्त अडीच टक्केच नोकºया दिल्या गेल्या आहेत. तर एकट्या पुण्याच्या वाट्याला ५० टक्के नोकºया आल्या आहेत. अशा स्थितीत वेगळा विदर्भ न होणे हा जनतेसोबत अन्याय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.