शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

विदर्भाच्या उपेक्षेमुळेच विणकरांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:47 IST

विदर्भ ही कापूस उगवणारी भूमी असूनही या प्रांताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे : अन्सार नगरात जाहीर सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ ही कापूस उगवणारी भूमी असूनही या प्रांताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. परिणामी नागपुरातील विणकर बेरोजगार झाले, असा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केला. गुरुवारी मोमिनपुºयातील अन्सार नगर चौकात विदर्भ राज्य आघाडीतर्फे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी हाजी वकील परवेज तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. शरफुद्दीन साहिल, अ‍ॅड. खलिक अंजर, अनिल जवादे, बाबू हिफजुर्रहमान, कार्यक्रमाचे संयोजक फहीम अन्सारी, डॉ. रमजान अन्सारी, अकील अहमद उपस्थित होते. अणे पुढे म्हणाले, नागपूर परिसरात दर्जेदार कापसाचे उत्पन्न व्हायचे. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने कापसाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कोलकाता ते नागपूर अशी रेल्वे लाईन टाकली. त्याकाळात नागपुरातील विणकरांची स्थिती चांगली होती. परंतु पुढे विदर्भाचा महाराष्ट्रात विलय झाला आणि चित्र बदलत गेले. नागपूरला वगळून इचलकरंजीला कापड निर्मितीचे केंद्र बनविण्यात आले.परिणामी नागपुरातून हा व्यवसायच संपुष्टात आला. विदर्भाचा महाराष्ट्रात विलय करताना अनेक प्रस्तावांवर करार झाले होते. त्या करारातंर्गत विदर्भाच्या लोकसंख्येच्या आधारावर विकास निधी, नोकरीत वाटा देण्याचे ठरले होते. परंतु आज नागपूर आणि अमरावती मिळून फक्त अडीच टक्केच नोकºया दिल्या गेल्या आहेत. तर एकट्या पुण्याच्या वाट्याला ५० टक्के नोकºया आल्या आहेत. अशा स्थितीत वेगळा विदर्भ न होणे हा जनतेसोबत अन्याय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.